शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची हेळसांडच कारणीभूत

By admin | Updated: August 19, 2014 02:08 IST

विठ्ठल फुलारी , भोकर शासनाचे अनुदान मिळत असतानाही विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्या़ जेवण्याची, राहण्याची, स्वच्छतेलाही मर्यादा पडत गेल्या़ यामुळे विद्यार्थ्यांसह

विठ्ठल फुलारी , भोकरशासनाचे अनुदान मिळत असतानाही विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्या़ जेवण्याची, राहण्याची, स्वच्छतेलाही मर्यादा पडत गेल्या़ यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही चिडले आणि आश्रमशाळेच्या तोडफोडसह पोलिसांवरही दगडफेक करण्यापर्यंत गोंधळ झाला़ संस्थेने चांगल्या सुविधा दिल्या असत्या तर कदाचित हा प्रकार झालाही नसता़भोकर तालुक्यातील साळवाडी (पांडुरणा) येथे संत गाडगेबाबा प्रतिष्ठान संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहे़ या शाळेत १२०० विद्यार्थी असले तरी ७६० विद्यार्थी निवासी आहेत़ या विद्यार्थ्यांना संस्थेकडून सुविधा देण्यास नेहमीच टाळाटाळ झाली़ या शाळेच्या एका भिंतीच्या फलकावर आठवडी भोजन मेनू लिहिण्यात आला़ मात्र प्रत्यक्षात येथे नाष्टा दिलाच जात नाही़ तर जेवणात भात, वरण व कच्ची पोळी दिली जाते़ भाजीचा तर पत्ताच नसतो असे येथील एका विद्यार्थ्याने सांगितले़ या शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षातून एखादा साबण दिला जातो तर डोक्याला लावायला तेलाचा तर थेंबही भेटत नाही़ मुलींच्या निवासस्थानी तर खिडकीला दरवाजा सोडा, साधा गजही बसविण्यात आला नाही़ यामुळे येथून बाहेरचा माणूस आत तर आतील विद्यार्थिनी सहज बाहेर येवू शकतात़ पाण्याचे शुद्ध जल असे जिथे लिहिले आहे, तिथे शुद्ध पाणी सोडा, साधा नळही बसविण्यात आला नाही़ विशेष म्हणजे हे शुद्ध जल शौचालयाच्या अगदी चिटकून असल्याने विद्यार्थ्यांना पाणी पितांनाही दुर्गंधीचा बचाव करावा लागाते़ शौचालय व बाथरूमची व्वयस्था तर अत्यंत दयनीय आहे़ यामुळे लहान-लहान विद्यार्थ्यांनाही रात्रीला शौचासाठी मोकळ्या हवेत जावे लागते़सदरील असुविधा बाबतीत विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत होती़ आणि संस्थेकडून विद्यार्थ्यांची मुस्कटदाबीही होत होती़ याकडे संबंधित विभागाचे अधिकारी मात्र मूग गिळून बसत असत़ शेवटी विद्यार्थी व पालकांनी संस्थेविरूद्ध आवाज उठविला़ शाळेवर दगडफेक झाली़ मोडतोड झाली़ पोलिसांवरही दगडफेक झाली़ शासनाच्या मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत व्वयस्थित पोहंचला असता तर कदाचित साळवाडीच्या आश्रमशाळेत गोंधळ झाला नसता़