शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

पाथरी, जिंतुरात पाऊस

By admin | Updated: June 2, 2016 23:21 IST

पाथरी/जिंतूर/आर्वी/सेलू : जिल्ह्यातील पाथरी, जिंतूर, सेलू व परभणी तालुक्यातील आर्वी येथे गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

पाथरी/जिंतूर/आर्वी/सेलू : जिल्ह्यातील पाथरी, जिंतूर, सेलू व परभणी तालुक्यातील आर्वी येथे गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळली तर काही घरावरील पत्रे वाऱ्यामुळे उडाली. वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या पावसाने पाथरी शहराजवळील रेणुका साखर कारखाना परिसरातील रस्त्यावर बाभळीचे मोठे झाड उन्मळून पडले. यामुळे तब्बल दोन तासांपेक्षा अधिक वेळ सेलू मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तर परभणी तालुक्यातील आर्वी येथे वीज पडूून बैलजोडी दगावल्याची घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. पाथरी परिसरात वादळी वाऱ्यासह गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडाली. जोराचे वारे सुटल्याने पाथरी-सेलू रस्त्यावर रेणुका शुगर कारखाना परिसरात असलेले बाभळीचे मोेठे झाड उन्मळून पडले. यामुळे बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. झाड रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी उशिरापर्यंत कोणीही पुढे आले नाही. दरम्यान, परभणी शहर परिसरात रात्री ८.३० च्या सुमारास हलका पाऊस झाला. बोरी व परिसरात सायंकाळी वादळी वारे झाल्याने झाड उन्मळून पडले. कान्हड येथे घरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाल्याची घटना घडली़ दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली़ कान्हड येथील गुलाब डोंबे यांच्या घरावरील माडीवरील पत्रे उडून नुकसान झाले़ विजेचे खांब, वृक्ष उन्मळून पडले़ अनेकांच्या कडब्याच्या गंजी उडून गेल्या़ सेलू, चारठाणा, भोगाव, जिंतूर व पूर्णा येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. (वार्ताहर)आर्वीत : वीज पडून बैलजोडी ठारपरभणी तालुक्यातील आर्वी येथे वीज पडल्याने एका बैलजोडीचा मृत्यू झाला. आर्वी गावात दुपारी पावणे तीन ते सव्वातीनच्या सुमारास अर्धातास पाऊस झाला. यामध्ये गावातील वैजनाथ दत्तराव हरकळ यांची बैलजोडी त्यांच्या शेतामध्ये उभी असताना अचानक बैलाच्या अंगावर वीज पडली. त्यामुळे दोन्ही बैल जागेवरच दगावले. यामध्ये शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.