शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न दुर्लक्षितच

By admin | Updated: July 16, 2014 01:26 IST

जालना: रेल्वे स्थानकांवर संरक्षणासाठी अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़

जालना: रेल्वे स्थानकांवर संरक्षणासाठी अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ औरंगाबाद ते परभणी या महत्वाच्या रेल्वे मार्गावरील बहुतांश स्थानकांत सुरक्षा व्यवस्था तोकडी असल्याने येथे लूटमार तसेच रेल्वेवर दगडफेकीचे प्रकार वारंवार घडत आहेत. जालना, रांजणी, पारडगाव, सातोना, परतूर, सेलू, मानवत या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर सातत्याने दगडफेक पाकीटमार, महिलांचे दागिने पळविणे आदी घटना खुलेआम घडतात. काही दिवसांपूर्वीच रेल्वेवर दरोडा टाकून प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर प्रवासी, राजकीय नेते व प्रसारमाध्यमांतून सुरक्षेविषयी आवाज उठविण्यात आला़ प्रवाशांच्या सुरेक्षेची मागणी करताच रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्थानकात शस्त्रधारी पोलिस तैनात करण्यात आले़ एकूणच वाढत्या चोऱ्यांमुळे प्रवाशी सतत असुरक्षित व भयभीत असतात़ अशा घटनानंतर स्थानिक पोलिसांची धावपळ होते़ रेल्वे पोलिस नंतर येऊन चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात़ तोपर्यंत आरोपी पसार झालेले असतात़ या सततच्या घटनांमुळे व प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रियांमुळे रेल्वे प्रशासनाने चार शस्त्रधारी पोलिस स्थानकावर नियुक्त केले होते़ मात्र, शस्त्रधारी पोलिस हळूच चोरपावलाने काढून ‘काठीधारी’ दोन पोलिस आता स्थानकावर दिसत आहेत़ म्हणजे पुन्हा प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावऱरेल्वे स्थानकावर गुन्हेगारी करणारे चोर, दरोडेखोर हे स्थानिक म्हणजे जवळच्या गावातीलच असतात. गुन्हेगार गुन्हा करून पसार होतात़ गुन्ह्याचे ठिकाण हे रेल्वे पोलिसांच्या अख्त्यारित येते़ यामुळे रेल्वे पोलिसांना घटना कळेपर्यंत व ते येईपर्यंत गुन्हेगार पसार होतात़ हे आरोपी शोधतांना स्थानिक पोलिस व रेल्वे पोलिस यांच्यात बऱ्याचदा गोंधळ होतो़ यात गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे.