शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

पराभवास वानखेडे स्वत:च जबाबदार

By admin | Updated: June 1, 2014 00:27 IST

हिंगोली : लोकसभा निवडणुकीतील पराभवाला स्वत: माजी खा. सुभाष वानखेडे हेच जबाबदार असून,

हिंगोली : लोकसभा निवडणुकीतील पराभवाला स्वत: माजी खा. सुभाष वानखेडे हेच जबाबदार असून, त्यांनी शिवसेना सोडून अन्य पक्षांसोबत घरोबा करणार्‍या व्यक्तींकडे प्रचार यंत्रणा दिल्यामुळे निष्ठावान शिवसैनिक नाराज झाले. याचा परिपाक वानखेडे यांच्या पराभवात झाला, असे उत्तर शिवसेनेच्या माजी पदाधिकार्‍यांनी वानखेडे यांना दिले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माजी खा. सुभाष वानखेडे समर्थकांकडून पराभवाचे खापर इतरांवर फोडण्याचा फंडा सुरू आहे. खरे तर गेल्या ३ वर्षांपासून वानखेडे यांच्या कार्यशैलीमुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. शिवसेनेचा उमेदवार बदलण्याची मागणी पक्ष प्रमुखांकडे जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी केली होती. मात्र वानखेडे यांनाच उमेदवारी मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला; परंतु गेल्या पाच वर्षांपासून त्यांची शिवसैनिकांशी नाळ तुटली होती. काँग्रेस- राष्टÑवादीच्या आमदारांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी माजी आमदार व जिल्हा परिषदेवर टीका केली. जि.प. अध्यक्ष व सभापती निवडीत सदस्यांमध्ये फूट पाडून विरोधकांशी हातमिळवणी केली. या त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या बाबी आहेत. तसेच वानखेडे यांनी संपूर्ण प्रचारयंत्रणा आजी-माजी पदाधिकार्‍यांना विश्वासात न घेता शिवसेना सोडून इतर पक्षांमध्ये गेलेल्या नेत्यांच्या हातामध्ये दिली. त्याचा परिपाक वानखेडे यांच्या पराभवात झाला. त्यामुळे दुसर्‍यांवर गद्दारीचा आरोप करणार्‍यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे आत्मपरीक्षण करावे व निष्ठावान शिवसैनिकांवर आरोप करू नये, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. प्रसिद्धीपत्रकावर माजी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत देशमुख, बालाजी तांबोळी, सखाराम उबाळे, बालाजी पाटील बोंढारे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. तसेच उपजिल्हाप्रमुख सुनील काळे यांचे नाव आहे. (जिल्हा प्रतिनिधी)