शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

ईएसआयसी दवाखान्यात रुग्णांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 7:17 PM

पंढरपुरातील राज्य कामगार विमा रुग्णालयात (ईएसआयसी) रुग्णांची हेळसांड सुरूआहे.

वाळूज महानगर : पंढरपुरातील राज्य कामगार विमा रुग्णालयात (ईएसआयसी) रुग्णांची हेळसांड सुरूआहे. लंचच्या नावाखाली मंगळवारी तब्बल दीड तास दवाखाना बंद ठेवण्यात आल्याने रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून ईएसआयसीने बजाजनगर येथे ईएसआयसी दवाखाना सुरूकेला. मात्र, काही दिवसांपासून हा दवाखाना आरोग्य सुविधा देण्याऐवजी इतर कारणाने चर्चेत आहे. दवाखान्यात गोळ्या औषधांचा कायम तुटवडा असतो. पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने रुग्णांना चांगले उपचार मिळत नाहीत. काही दिवसांपूर्वी इमारतीची दुरवस्था झाल्याने हा दवाखाना बजाजनगरातून पंढरपूर येथे स्थलांतरित करण्यात आला. किमान याठिकाणी तरी चांगले आणि वेळेवर उपचार मिळतील, अशी अपेक्षा कामगारांना होती. मात्र, येथेही कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे हेळसांड सुरूच असल्याने कामगार रुग्णांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दवाखान्याची वेळ आहे. मंगळवारी दुपारी लंचच्या नावाखाली साडेबारापासून दोन ते सव्वादोन वाजेपर्यंत दवाखाना बंद ठेवण्यात आला. त्यामुळे जवळपास ४० रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे या ठिकाणी रुग्णांना बसण्याची सोय नाही. त्यामुळे महिला-परुष रुग्णांना रस्त्यावरच उन्हात ताटकळत बसावे लागते, तर काही रुग्ण दवाखान्यात पायऱ्यांवर दवाखाना उघडण्याची प्रतीक्षा करताना दिसून आले. उपचार मिळणे तर दूरच पण बसायला जागाही मिळत नसल्याने रस्त्यावर बसावे लागत असल्याचा आरोप पंकज इंगोले, इरफान सय्यद, संभाजी शेजूळ, अनिता वाघ, भारती धडे, सीमा वखरे, आदित्य इंगळे, अर्चना इंगळे, विजय राऊत, सखाराम देशमुख, रुस्तुम चापे, शुभम विनोदकर, सचिता कळमकर, मोहन मालोदे आदी रुग्णांनी केला आहे.

या विषयी ईएसआयसी दवाखान्याचे डॉ. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता लंच असल्याने काही काळ दवाखाना बंद होता, असे त्यांनी सांगितले.फोटो ओळ - ईएसआयसी दवाखाना बंद असल्याने कामगार रुग्णांना दवाखान्याबाहेर ताटकळत बसावे लागले. पहिल्या छायाचित्रात रस्त्यालगत बंद दुकानासमोर, तर दुसºया छायाचित्रात पायऱ्यांवर बसलेले रुग्ण व नातेवाईक.

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWalujवाळूज