शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ खुले

By admin | Updated: July 3, 2016 00:51 IST

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ २४ तास खुले ठेवण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरी मागितली आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ २४ तास खुले ठेवण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरी मागितली आहे. यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयानेही सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच विमानतळ २४ तास खुले राहील. यातून विमानसेवा वाढण्यासाठीही हातभार लागेल.
चिकलठाणा विमानतळ आजघडीला दोन शिफ्टमध्ये सुरू राहते. विमानतळ सकाळी ६.१५ वाजेच्या विमानसेवेसाठी खुले होते आणि रात्री ८.४० वाजेच्या विमानाच्या उड्डाणानंतर बंद होते. रात्रीच्या वेळी विमानतळ सुरू राहिल्यास त्याचा विमानसेवा वाढण्यासाठी फायदा होईल. त्यामुळे प्राधिकरणाने यादृष्टीने पाऊल टाकले आहे. चिकलठाणा विमानतळ २४ तास खुले ठेवण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरी मागण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावर अनेकदा खराब हवामान, विमानांची गर्दी आणि अन्य कारणांमुळे लँडिंगसाठी विमानांना अनेकदा प्रतीक्षा करावी लागते.
अशा वेळी विमानांना आकाशात घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नसतो. विमानात पुरेसे इंधन असेपर्यंत घिरट्या घातल्या जातात; परंतु अपुऱ्या इंधनामुळे विमान अन्य विमानतळाकडे पाठविले जाते. अशा विमानांसाठी औरंगाबादेतील चिकलठाणा विमानतळ हे अधिक जवळ पडते. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अशा प्रकारे चिकलठाणा विमानतळावर विमानांचे लँडिंग झाले. मुंबई विमानतळावर लँडिंगसाठी अडचण येणाऱ्या विमानांना चिकलठाणा विमानतळाचा पर्याय समोर आला आहे. चिकलठाणा विमानतळ २४ तास खुले ठेवण्यासाठी मंजुरी मागताना हीच बाब प्राधिकरणाने आवर्जून नमूद केली आहे. रात्रीच्या वेळी ६ विमाने उभी राहू शकतात, असे विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय म्हणाले.