शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या दिमतीला केवळ २१ शहर बस

By admin | Updated: May 31, 2014 01:24 IST

साहेबराव हिवराळे, औरंगाबाद मेट्रोसिटीकडे वाटचाल करणार्‍या औरंगाबाद शहरांतर्गत वाहतुकीची जबाबदारी फक्त २१ शहर बसवर अवलंबून असून,

साहेबराव हिवराळे, औरंगाबाद मेट्रोसिटीकडे वाटचाल करणार्‍या औरंगाबाद शहरांतर्गत वाहतुकीची जबाबदारी फक्त २१ शहर बसवर अवलंबून असून, सिडको स्थानकातून वाळूज, चिकलठाणा आणि औरंगपुरा, रेल्वेस्टेशन वगळता इतर भागांत शहर बस फिरकताना दिसत नाहीत. खाजगी वाहनांच्या भरवशावरच प्रवाशांना अवलंबून राहावे लागत आहे. मुंबई, पुणे या ठिकाणी प्रवाशांची प्रचंड वर्दळ आहे. त्याखालोखाल औरंगाबादेतही वर्दळ वाढती आहे. येथे जागतिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या अजिंठा, वेरूळ लेण्या, दौलताबाद किल्ला, मकबरा, पाणचक्की व शहराचा दर्जा वाढविणारे मॉल, सिनेमा थिएटर्स, कारखाने आहेत. पर्यटक शहरात आकर्षिले जात आहेत; परंतु येथील शहर वाहतूक सेवा अत्यंत तोकडी असल्याने खाजगी वाहनांनी प्रवास करण्याशिवाय सामान्य नागरिकांना पर्यायच उरत नाही. याविषयी शहरातील कामगार, पालक, नागरिकांत तीव्र नाराजीचा सूर आहे. रिंगरूट बससेवा हवी दहा वर्षांपूर्वी चिकलठाणा ते रेल्वेस्टेशन, बाबा पेट्रोल पंप ते सिडको हडको, पुन्हा चिकलठाणा अशी रिंगरूट बससेवा चालू होती. शाळकरी मुलांपासून ते नोकरवर्गासह सामान्य व्यक्तीही जेमतेम पैशांत दररोज शहरभर फिरत होते; परंतु आता खाजगी वाहनांचा आर्थिक भुर्दंड सहन करीत प्रवास करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. -राजू साबळे सामान्यांचा विचार व्हावा सामान्य कामगारांना खाजगी वाहनाने ये-जा करणे परवडत नाही. शहर बसची संख्या वाढविल्यास प्रवाशांच्या खिशाला आर्थिक झळ कमी बसेल. खेड्यातून शहरात येणार्‍या नातेवाईकांना तुम्ही शहर बसने सरळ घरी या, असे म्हणताच येत नाही. कारण रस्त्यावर बसेसची संख्या अंत्यंत कमी आहे. -किशोर जाधव याविषयी एसटी महामंडळाचे अधिकारी सुपेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्या ज्या बस सुरू आहेत, त्यात काही बदल नाही, शाळा व कामगारांचा आम्ही अजून विचार केलेला नाही. सतत मागणी होत असली तरी सातारा, शेंद्र्यासाठी किंवा रिंगरूट बससेवेविषयीही वरिष्ठांच्या होकाराशिवाय काही नियोजनच नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मजुरांची होतेय गैरसोय हंगामी मजुराला वाळूज, पडेगाव, शेंद्रा तसेच सातारा इत्यादी भागात कामासाठी जावे लागते, त्यांना खाजगी वाहनाने ये-जा करावी लागते. प्रवासासाठी ठेकेदाराला दररोज अधिकचे पैसे द्यावेच लागतात किंवा खाजगी वाहनने त्यांची दररोज ने-आण करावी लागते. झपाट्याने वाढणार्‍या शहराला शहर बसच्या जाळ्याने का जोडले जात नाही. -अण्णासाहेब खरात