शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

टेलीमेडिसीनद्वारे १५३६ रूग्णांवर आॅनलाईन उपचार

By admin | Updated: March 13, 2016 14:27 IST

हिंगोली : वैद्यकीय क्षेत्रात रूग्णांवर आधुनिक पद्धतीद्वारे उपचार केल्या जात आहेत. हिंगोली जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये टेलीमेडिसीनच्या सहाय्याने रूग्णांवर उपचार केल्या जात आहेत.

हिंगोली : वैद्यकीय क्षेत्रात रूग्णांवर आधुनिक पद्धतीद्वारे उपचार केल्या जात आहेत. हिंगोली जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये टेलीमेडिसीनच्या सहाय्याने रूग्णांवर उपचार केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळत असून २०१५-१६ यावर्षात १५३६ विविध रूग्णांवर टेलिमेडीसीनद्वारे उपचार करण्यात आले. आॅनलाईन उपचारपद्धतीमध्ये गती यावी, त्यासाठी दर सोमवारी विभागामध्ये व्हिडीओ कॉन्फरसने विविध राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांसोबत चर्चा केली जात आहे. वसमत येथील टेलिमेडीसीनच्या मदतीने ६३६ तर हिंगोली येथील ९०० रूग्णांवर उपचार करण्यात आले.जिल्हा सामान्य रूग्णालयात २००९ पूर्वी टेलीमेडीसनची सुविधा सुरू करण्यात आली. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या आजारांवरही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार केल्या जात आहेत. आधुनिक पद्धतीमुळे अनेक रूग्णांना दिलासा मिळाला असून हिंगोली येथील टेलीमेडीसीन विभागातंर्गत त्वचारोग असलेल्या ५७४ रूग्णांवर उपचार करण्यात आले. तर सर्जरीच्या २२, रेडॉलॉजीच्या ४४, अर्थोपेडीक १९, एआरटी १९, युनानी ४ व मेडीसीन ११७ जणांना लाभ मिळाला आहे. तर वसमत येथील रूग्णालयात ६३६ रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. सुविधेमुळे रूग्णांना फायदा होत असून डॉक्टरांनाही नेमके कुठले उपचार करावयाचे आहेत या विषयी माहिती मिळत आहे. परंतु या काम करणारे कर्मचारी मोजकेच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथील कामात गती येण्यासाठी मनुष्यबळ वाढविणे तितकेच महत्वाचे आहे.सदर सुविधा मुंबई येथील जे. जे. व नानवटे रूग्णालय तसेच पूणे, औरंगाबाद, व नागरपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नीत आहे. येथील तज्ञ डॉक्टरांच्या सल्याने टेलिमेडीसीनद्वारे संपर्क करून रूग्णांवर योग्य उपचार कसे केले जावेत याविषयी सल्ला दिला जातो. तसेच आवश्यक मार्गदर्शन करून रूग्णांवर उपचार केल्या जात आहेत. या सुविधेमुळे रूग्णांना बाहेर उपचरासाठी आवश्यकता नाही. तसेच त्यांचा वेळ वाचतो. शिवाय पैशाची बचत होऊन गैरसोय होत नाही.(प्रतिनिधी)