शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

‘एक वही भावासाठी, एक पुस्तक बहिणीसाठी’; पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 6:57 PM

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा उपक्रम

ठळक मुद्दे शालेय साहित्य कोल्हापूर, सांगली आणि साताराच्या शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल.

औरंगाबाद : सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत सर्वस्व गमावलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. या नागरिकांच्या पाल्यांच्या शाळा येत्या आठ दिवसांत उघडल्या जातील. तेव्हा या बालकांना शाळेत जाण्यासाठी वही, पेन, पुस्तक, कंपास आदी शालेय साहित्य असणार नाही. या तिन्ही जिल्ह्यांतील प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत येताच हे साहित्य मिळावे, यासाठी औरंगाबाद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी एक अभिनव उपक्रम सुरूकेला आहे. ‘एक वही भावासाठी, एक पुस्तक बहिणीसाठी’ उपक्रमांतर्गत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य आणून मुख्याध्यापकांकडे जमा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यात राज्यातील नागरिक, शासनाकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचविण्यात येत आहे. येत्या आठ-दहा दिवसांत जनजीवन सुरळीत होईल. गावांमधील शाळा उघडल्या जातील. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची घरे आठ दिवसांपासून पाण्यात होती. त्यामुळे घरातील प्रत्येक वस्तू नष्ट झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यही पावसाने हिरावून घेतले आहे. अगोदरच या भागातील नागरिकांचे जीवन जगण्याचे वांधे झालेले असल्यामुळे या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळणे कठीण आहे. राज्यभरातून विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याविषयी मदत करण्यात येत नाही. त्यामुळे आपल्या  भावा-बहिणींसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक वही, एक पुस्तक, कंपास साहित्य आणावे. हे साहित्य पुरात शालेय साहित्य वाहून गेलेल्या आपल्या बहीण, भावांसाठी पाठविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आणलेले शालेय साहित्य मुख्याध्यापकांनी एकत्र जमा करून घ्यावे, हे जमलेले साहित्य वस्तूनुसार वेगवेगळे करून माध्यमिक शिक्षणाधिकारी, चेलीपुरा हायस्कूल, स्टेशन रोड येथे आणून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांकडून जमा झालेले हे शालेय साहित्य कोल्हापूर, सांगली आणि साताराच्या शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. तेथून ते साहित्य प्रत्येक शाळेत पाठविले जाईल, असेही डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

उपक्रमशील शिक्षणाधिकारी म्हणून नावलौकिकजि.प. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण हे नियमितपणे विविध उपक्रम राबवत असतात. दहावी-बारावी परीक्षेच्या काळात विविध केंद्रांना भेटी देऊन त्यांनी कॉपी रोखण्यावर भर दिला होता. ४यात मोठ्या कारवाईसुद्धा केल्या आहेत. यावर्षी शाळा भरताच त्यांनी मुख्याध्यापक, संस्थाचालकांची बैठक घेत कॉपीमुक्तीसाठी आतापासून प्रयत्न सुरू आहेत.४ तसेच प्रत्येक विद्यार्थी, शिक्षकांना मदत करणे, उपक्रम राबविण्यातही त्यांचा नावलौकिक आहे. यावेळी त्यांनी सामाजिक भान जपत पूरग्रस्तांसाठी साहित्य जमा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत सर्वजण नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करत आहेत. आपण शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे हा उपक्रम सुरू केला आहे. यात समाजातील घटकही सहभागी झाल्यास त्यांचेही स्वागतच करूत. तरी जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थ्यांना आपल्या भावा-बहिणींसाठी एक वही, एक पुस्तक घेऊन येतील असा विश्वास आहे.- डॉ. बी.बी. चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी, औरंगाबाद 

टॅग्स :floodपूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबादTeacherशिक्षकStudentविद्यार्थी