शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
अंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
4
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
5
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
6
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
7
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
8
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
9
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
10
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
11
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
12
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
13
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
14
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
15
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
16
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
17
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
19
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
20
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
Daily Top 2Weekly Top 5

पाणलोट योजनेमुळे ओलित क्षेत्र वाढले

By admin | Updated: June 9, 2014 01:12 IST

श्रीक्षेत्र माहूर : गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाची माहूर तालुक्यावर सतत अवकृपा झाल्याने दोन्ही वर्षात पावसाळी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले़

श्रीक्षेत्र माहूर : गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाची माहूर तालुक्यावर सतत अवकृपा झाल्याने दोन्ही वर्षात पावसाळी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले़ नुकसान भरपाईसाठी आलेल्या निधीतून माहूर तालुका कृषी कार्यालयाने शेतात अनेक कामे केली़ त्यामुळे कोरडवाहू माहूर तालुक्यातील ४ हजार हेक्टर शेती ओलिताखाली आली आहे़माहूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५२ हजार ९३० हेक्टर असून जंगलाचे प्रमाण १० हजार २९१ हेक्टर आहे़ पैकी २०२१ हेक्टर जमीन ओसाड व लागवडअयोग्य आहे़ बिगर शेती क्षेत्र ८९६ हेक्टर आहे़ चराऊ क्षेत्र म्हणून ४४३९ हेक्टर जमीन राखीव आहे़ लागवडीलायक क्षेत्र शेती ३४ हजार ४०० हेक्टर आहे़ इसारा क्षेत्र म्हणून १५ हजार ४५० हेक्टर जमीन आहे़ तर तालुक्यात ५ हजार ३११ हेक्टर शेती सिंचनाखाली आहे़ दोन वर्षांखाली हे क्षेत्र १५०० हेक्टर होते़ गेल्या दोन वर्षापासून सतत अतिवृष्टी व नापिकी १४०० मि़ मी़ पेक्षा जास्त झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले़ त्यातल्या त्यात यावर्षी तालुक्यातील सर्वच गावांना बसलेल्या गारपिटीच्या तडाख्याने होत्याचे नव्हते झाल्याने त्याचा परिणाम लग्नसराईवरही दिसून आल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना या दोन वर्षात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला़ त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना गारपीट अनुदान देण्यात येवून शेतकऱ्यांच्या शेती शेतीदुरूस्तीसह सिंचनक्षमता वाढविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या कामांना प्राधान्याने सुरुवात करणे भाग पडले़ माहूरच्या तालुका कृषी कार्यालयाकडून गतिमान पाणलोट आदिवासी उपाययोजना या योजनेअंतर्गत २०१२-१३ मध्ये तुळशी कुपटी, मलकागुडा, मलकागुडातांडा, वाईबाजार, शेलू, करंजी, वायफनी, भगवती, रुपलानाईक तांडा, लसनवाडी, सतगुडा, सिंदखेड, गोकुळ गोंडेगाव येथे साठे तीन कोटी रुपये खर्चून शेत दुरूस्तीसह बांध बंदिस्ती मातीनाला बांध, सिमेंट नाला बांध, ढाळीचे बांध आदी कामे करण्यात आली़ तर २०१३-१४ चा चालू वर्षात चोरड, भोरड, जुनापाणी, अंजनखेड, सावरखेड, गोंडवडसा, वसराम नाईकतांडा, नाईकवाडी, हरडफ या गावांत सव्वा तीन कोटी रुपये खर्चून २५०० हेक्टर शेतजमिनीवर वरील कामे अंतिम टप्प्यात आहेत़ एकूण दोन वर्षात कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ६५०० हेक्टर श्ेत जमिनीवर जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत व याआधी शेततळे अभियान राबवून १५५ शेततळी तयार करण्यात आल्याने या कामाअंती शेतजमिनीत ११ लाख क्युबिक पाणी मुरणार आहे़ जलसंधारणाची कामे मशीन्सद्वारे होत असल्याने येथे मजुरांना काम देण्याची मागणी होत आहे़ (वार्ताहर)