शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष माघारीकडे

By admin | Updated: September 29, 2014 00:38 IST

जालना : राज्यात युती आणि आघाडीत झालेल्या फुटीनंतर निवडणूक रिंगणातील प्रबळ उमेदवारांची संख्या वाढल्याने बहुतांश ठिकाणी निवडणूक चौरंगी, पंचरंगी, बहुरंगी होत आहे.


जालना : राज्यात युती आणि आघाडीत झालेल्या फुटीनंतर निवडणूक रिंगणातील प्रबळ उमेदवारांची संख्या वाढल्याने बहुतांश ठिकाणी निवडणूक चौरंगी, पंचरंगी, बहुरंगी होत आहे. उमेदवारी न मिळाल्याने काही राजकीय पक्षातील मंडळींनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यामुळे आता १ आॅक्टोबरपर्यंत माघार कोण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी यासह अन्य काही पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये काही पक्षांना उमेदवार शोधावे लागल्याने अन्य पक्षातील नाराज उमेदवाराला आपल्या पक्षात बोलावून नेतेमंडळींनी त्यांना उमेदवारीची संधी दिली आहे.
युती व आघाडीच्या फुटीपूर्वी काही उमेदवारांनी आपल्या विजयाची गणिते लावताना ठराविक मतांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. परंतु या फुटीनंतर हे गणित बिघडले.
आता पुन्हा नव्याने गणित मांडत उद्दिष्टाचा आकडा कमी झाला असला तरी मित्रपक्षाची साथ आता मिळणार नसल्याने ही आकडेवारी गाठणे देखील काहींना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.
प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली असून बंड केलेल्या उमेदवारांची समजूत काढून त्यांच्या माघारीचाही प्रयत्न सुरू आहे. (प्रतिनिधी)