शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकार्‍यांना ‘त्या’ प्रकरणी दिली नोटीस

By admin | Updated: May 9, 2014 00:39 IST

जिंतूर : कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकारी यांना न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या आहेत़

 जिंतूर : पालिकेतील तेरा कर्मचार्‍यांना स्थायी नियुक्तीचे आदेश देण्यात यावेत, या कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने नांदेड येथील कामगार न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकारी यांना न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या आहेत़ जिंतूर पालिकेतील जितेंद्र बाबाराव रोकडे, सुंदर नामदेव खिल्लारे, किशोर कानडे, मैनाबाई कामिठे, मोहनाबाई घनसावंत, दैवशाला साबळे, रामू मोहिते, ग्यानू घनसावंत, दिगंबर घोगरे, कमल कुºहे, काशीबाई बोबडे, प्रयागबाई वाकळे, मथुराबाई घनसावंत यांनी २००८ मध्ये कामगार न्यायालय जालना येथे याचिका दाखल केली़ याचिकेत म्हटले की, आम्ही फिर्यादी १७ ते १८ वर्षांपासून पालिकेत नियमित काम करीत असून, २४० दिवसांपेक्षा जास्त दिवस हजेरी पटावर स्वाक्षर्‍या करून काम केले आहे़ परंतु, पालिकेने आम्हाला कायम केले नाही़ या याचिकेची सुनावणी होऊन २० आॅक्टोबर २०१० ला जालना न्यायालयाने या सर्व कर्मचार्‍यांना कायम करण्याचे आदेश दिले़ परंतु, जालना न्यायालयाच्या निर्णयाला पालिका प्रशासनाने उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले़ औरंगाबाद खंडपीठाने ३ एप्रिल २०१३ ला जालना कामगार न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला व या कामगारांना कायम करण्याचे आदेश दिले़ परंतु, पालिका व नगरविकास विभागाने या बाबत निर्णय घेतला नाही़ त्यामुळे याचिकाकर्ते जितेंद्र बाबाराव रोकडे यांनी कामगार न्यायालय नांदेड येथे राज्याचे मुख्य सचिव श्रीकांत सिंह, विभागीय आयुक्त संजय कुमार, जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह, मुख्याधिकारी निशीकांत प्रचंडराव यांच्याविरूद्ध १५ आॅक्टोबर २०१३ ला अवमान याचिका दाखल केली होती़ या प्रकरणी सुनावणी होऊन वरील सर्वांना न्यायालयाने नोटीसा बजावल्या आहेत़ (वार्ताहर) मागील १७ वर्षांपासून पालिकेत कायम करावे, यासाठी हे १३ कर्मचारी झगडत आहेत़ न्यायालयाने कायम करण्याचा आदेश दिल्यानंतरही प्रशासकीय पातळीवर फारशा हालचाली होत नसल्याने अखेर याचिकाकर्त्यांनी अवमान याचिका दाखल केली होती़ अवमान याचिकेनंतर तरी आम्हाला न्याय मिळेल का? या प्रतिक्षेत हे १३ कर्मचारी आहेत़