शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

समलिंगी लग्नावर न्यायालयाचा घाईत निर्णय नको; विश्व हिंदू परिषद करणार कडाडून विरोध

By प्रशांत तेलवाडकर | Published: May 06, 2023 7:33 PM

लग्नविधी हा भारतीय समाजातील सर्वच जाती-धर्मामध्ये पवित्र असा विधी आहे.

छत्रपती संभाजीनगर : सध्या देशात पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणाऱ्यांमध्ये समलिंगी विवाहाचे फॅड आले आहे. अशा विवाहांना मान्यता द्यावी की अथवा नाही, यासंदर्भात सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशा समलिंगी विवाहांना मान्यता म्हणजे समाजासाठी घातक ठरू शकते. समाजाचा समतोल बिघडू शकतो. यासाठी समाजातील सर्व घटकांचा विचार ऐकावा तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने घाईघाईत निर्णय घेऊ नये, अशी विनंती विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी केली.

विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी व बजरंग दलाचे प्रशिक्षण शिबिर देशभरात सुरू आहे. त्यानिमित्ताने परांडे यांचे शुक्रवारी शहरात आगमन झाले. सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी सांगितले की, लग्नविधी हा भारतीय समाजातील सर्वच जाती-धर्मामध्ये पवित्र असा विधी आहे. यामुळे समलिंगी विवाहांना सर्व स्तरातून विरोध होत आहे. निर्णय घेण्यापूर्वी याचा विचार न्यायालयाने करणे आवश्यक आहे, असे विहिंपचे मत आहे. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले; पण काही राजकीय पक्ष या नावाला विरोध करीत आहेत. या विरोधात विहिंप आक्रमकपणे उभी राहील. दोन महिन्यांत देशात विविध भागांत दंगली घडल्या. त्या घडविणाऱ्यांना कठोर शासन करावे, अशी मागणीही त्यांनी केली. या पत्रपरिषदेस प्रांताध्यक्ष संजय बारगजे, आनंद पांडे यांची उपस्थिती होती.

धर्मांतरविरोधी कायदा महाराष्ट्रातही लागू करावाधर्मांतरविरोधी कायदा काही राज्यांत लागू झाला. केंद्र सरकारनेही यासाठी पुढाकार घ्यावा, महाराष्ट्रातही राज्य शासनाने कायदा लवकर लागू करावा, अशी मागणी विहिंपतर्फे करण्यात आली.

मंगळवारी देशभरात सामूहिक हनुमान चालिसा पठणबजरंग दलावर बंदी आणण्यासाठी काँग्रेससह अन्य राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. त्यास विरोध दर्शविण्यासाठी बजरंग दल, विहिंपतर्फे देशभरात मंगळवारी (९ मे) सायंकाळी सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यात येणार असल्याची घोषणा परांडे यांनी केली.

टॅग्स :Courtन्यायालयLGBTएलजीबीटीAurangabadऔरंगाबाद