शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मानसिकता बदलण्याची गरज..

By admin | Updated: November 30, 2015 23:29 IST

जालना : संपूर्ण जिल्ह्यातील गावे पाणंदमुक्त करण्यासाठी सरपंचांसोबतच ग्रामस्थांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे

जालना : संपूर्ण जिल्ह्यातील गावे पाणंदमुक्त करण्यासाठी सरपंचांसोबतच ग्रामस्थांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे मत पाटोदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्कर पेरे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदच्या वतीने हगणदारी मुक्त गाव करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर, अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, समाजकल्याण सभापती शहाजी राक्षे, दगडवाडीच्या सरपंच आशाताई पांडे आदींची उपस्थिती होती. पेरे म्हणाले, गावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढल्यानेच विविध आजार वाढले आहेत. गावाच्या सरपंचाने जर ठरविले संपूर्ण गाव हगणदारी मुक्त करणार तर ते होऊ शकते. त्यासाठी पहिल्यांदा सरपंचाने आपला सरपंचपणाची झूल अंगावरून उतरवून जास्तीस जास्ती नागरिकांशी संवाद साधून त्यांना हगणदारीमुक्तचे महत्व पटवून द्यावे.गावे हगणदारीमुक्त करणे हे फार अवघड काम आहे. त्यासाठी खूप परिश्रम घेण्याची गरज आहे.माझ्या गावात अडाणी बायकांनी कर्ज काढून त्यावेळ चार हजार रूपयात संडास बांधला आत्ता शासन १२ हजार रूपये देऊनही शौचालय बांधले जात नसल्याची खंत पेरे यांनी व्यक्त केली.सरपंचांनी पक्षभेदाभेद सोडून सर्वांना सोबत घेऊन गावात विकास करणे गरजचे आहे.यावेळी खासगावचे सरपंच संतोष लोखंडे यांनीही गावात केलेल्या विकासाबद्दल उपस्थित सरपंचाना मार्गदर्शन केले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर महिला सरपंच निवडून आल्या आहेत. त्यांच्या पतींनी त्यांना सरपंच म्हणून वावरण्यासाठी मुभा देण्याची गरज आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी स्वच्छ भारतची संकल्पना पटवून सांगितली.जिल्ह्यातील गावांना हगणदारीमुक्त करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे चौधरी म्हणाले. जि.प. अध्यक्ष जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हातील १३८ गावांचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आदींसह जि.प. सदस्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)