शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यावर नावापुरते महिला लोकशाही दिन

By admin | Updated: September 14, 2014 23:35 IST

भास्कर लांडे, हिंगोली महिलांची पायपीट थांबून स्थानिक ठिकाणीच त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने तालुकास्तरावर सुरू केलेल्या महिला लोकशाही दिनास ग्रामीण भागातून उदासीनता दिसून येते.

भास्कर लांडे, हिंगोली
महिलांची पायपीट थांबून स्थानिक ठिकाणीच त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने तालुकास्तरावर सुरू केलेल्या महिला लोकशाही दिनास ग्रामीण भागातून उदासीनता दिसून येते. महिलांच्या हक्काचे संरक्षण होण्याऐवजी उलट आपले नाव उजागर होईल, या भीतीमुळे तक्रार देण्यास महिला पुढे येत नाहीत. परिणामी दीड वर्षातील १४ लोकशाही दिनात एकाही महिलेची तक्रार आली नसल्याने तालुकास्तरावर हा दिन नावालाच उरला आहे.
महिलांच्या समस्या त्वरीत निकाली काढण्यात याव्यात, या हेतूने ४ मार्च २०१३ रोजी राज्य शासनाने लोकशाही दिन साजरा करण्याचा आदेश काढला. महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर या निर्णयाची अंमलबजावणीचा आदेश दिला. पुढे मंत्रालय स्तरावरही समिती स्थापन करण्यात आली. खुद्द महिला व बालविकास मंत्रीच या समितीच्या अध्यक्ष आहेत. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन साजरा केला जातो. येथे बऱ्यापैकी प्रतिसाद असल्यामुळे आजपर्यंत झालेल्या १४ दिनात २९ तक्रारी आल्या. त्यातील २४ प्रकरणाचा निपटारा झाला. उर्वरित पाच प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात नगरपालिका आणि महावितरणचे अनुक्रमे २ आणि हट्टा पोलिस ठाण्याच्या मिळून ५ तक्रारींचा समावेश आहे. उलट स्थिती ग्रामीण भागातील आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी महिला येण्यास धजावत नाहीत. तक्रारीसाठी शहरात जाऊन लोकांना सामोरे जाण्यास बहुतांश महिला तयार नसतात. म्हणून शासनाने तक्रारदार महिलांच्या हक्काचे संरक्षण व्हावे, यासाठी लोकशाही दिन ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरावर हा दिन ठेवला. त्याकडे महिलांनी पूर्णत: पाठ फिरवली. तक्रार नोंदणीचे रजिस्टरही उघडण्याची वेळ आली नाही. कर्मचाऱ्यांनाच तक्रारदार महिलांची वाट पहावी लागते. दीड वर्ष लोटत असताना एकही तक्रार आली नाही. चार लोकांत आपले नाव उघडे पडेल, या भीतीपोटी महिला तक्रारी देत नाहीत. नित्य परिचयाच्या लोकांसमोर जाण्यासही महिला तयार नाहीत. परिणामी ग्रामीण भागात महिलांमध्ये उदासीनता कायम असून अधिक जनजागृतीची गरज आहे.