शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विविध पेढ्यांमध्ये मोठी रक्तटंचाई

By admin | Updated: May 19, 2014 01:32 IST

औरंगाबाद : कडक उन्हाळा, लग्नसराई आणि निवडणुकीच्या धामधुमीमुळे दीड महिन्यापासून रक्तदानाचे प्रमाण घटले असताना त्याची मागणी मात्र कायम आहे.

 औरंगाबाद : कडक उन्हाळा, लग्नसराई आणि निवडणुकीच्या धामधुमीमुळे दीड महिन्यापासून रक्तदानाचे प्रमाण घटले असताना त्याची मागणी मात्र कायम आहे. मराठवाड्यातील सर्वांत मोठी शासकीय रक्तपेढी घाटी रुग्णालयात आहे. तेथे हजार ते बाराशे रुग्ण वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये दाखल असतात. विशेषत: सिझेरियन आणि गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यांतून महिला घाटी रुग्णालयात दाखल होतात. सिझेरियन प्रसूतीदरम्यान रुग्णास रक्त द्यावेच लागते. शस्त्रक्रिया सुरू असतानाही बर्‍याचदा रुग्णांना रक्त द्यावे लागते. रक्तक्षय रोगी, घात-अपघातातील गंभीर जखमींना, सर्पदंश झालेल्यांना रक्ताची नितांत गरज असते. रोज सरासरी ६० ते ७० बॅग रक्त आणि रक्तघटकांची मागणी रक्तपेढीकडे येते, अशी माहिती शासकीय रक्तपेढीतील रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. पी.एम. जठार यांनी दिली. डॉ. जठार म्हणाले की, शाळा, महाविद्यालयांना सध्या सुट्या असल्यामुळे रक्तदान करणार्‍यांची संख्या घटली आहे. संयोजक उन्हाळ्यात रक्तदान शिबीर घेण्याचे टाळतात. मे महिन्यात आतापर्यंत सहा शिबिरे झाली आहेत. शिबिरांची संख्या घटली असली तरी मागणी मात्र कायम वाढतच असल्यामुळे रुग्णांना रक्त कोठून द्यावे, असा प्रश्न आहे. सध्या केवळ चार दिवस पुरेल एवढेच रक्त आहे, असे डॉ. जठार म्हणाले. बी पॉझिटिव्ह ग्रुपचे रक्त शिल्लक नसल्याचे ते म्हणाले. रुग्णांच्या सोयीसाठी नागरिकांनी घाटीत येऊन उत्स्फू र्तपणे रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. अमृता रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी शामराव सोनवणे म्हणाले की, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. रक्ताची मागणी मात्र कायम असल्याने सध्या विविध ग्रुपच्या रक्ताचा तुटवडा आहे. रक्तदान शिबिरे होणे आवश्यक आहे. दत्ताजी भाले रक्तपेढीचे संचालक डॉ. महेंद्रसिंह चौहान म्हणाले की, रोज सरासरी १०० रुग्णांना रक्तपेशींचा पुरवठा करावा लागतो. आमच्या रक्तपेढीत रक्त आहे. मात्र, प्रत्येकाने नियमित रक्तदान करायला हवे. रक्तदानामुळे रुग्णाचे प्राण वाचतात. त्यामुळे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. थॅलेसेमियाच्या रुग्णांना नियमित गरज थॅलेसेमियाच्या रुग्णांना दोन ते तीन आठवड्यांतून एकदा रक्त द्यावे लागते. त्या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. घाटीत दरमहा सुमारे १५० ते २०० थॅलेसेमियाचे रुग्ण दाखल होतात. त्यांना रक्तपुरवठा केला जातो. शहरातील सर्वच रक्तपेढ्यांमध्ये थॅलेसेमियाचे रुग्ण रक्ताची मागणी नोंदवितात. त्यांना मोफत आणि वेळेवर रक्तपुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित रक्तपेढीची असते.