शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या विदर्भासाठी समर्थ नेतृत्वाचा अभाव

By admin | Updated: January 11, 2016 00:07 IST

औरंगाबाद : विदर्भाकडे दीर्घकाळ राजकीय नेतृत्व होते. तरीदेखील विदर्भाचा विकास झाला नाही. राजकीय सत्ता एखाद्या प्रदेशाकडे असली म्हणजे


औरंगाबाद : विदर्भाकडे दीर्घकाळ राजकीय नेतृत्व होते. तरीदेखील विदर्भाचा विकास झाला नाही. राजकीय सत्ता एखाद्या प्रदेशाकडे असली म्हणजे त्याचा विकास होतोच असे नाही. मध्यवर्ती सत्तेत दुबळेपणा असला की स्वतंत्र राज्याची मागणी रेटली जाते. स्वतंत्र राज्याची मागणी करीत असतानासुद्धा विदर्भाला समर्थ नेतृत्व मिळाले नाही, असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उदारकला (लिबरल आर्टस्) विभाग आणि अमेरिकेतील ‘महाराष्ट्र स्टडीज ग्रुपतर्फे आयोजित ‘महाराष्ट्र : प्लेस अँड स्पेस’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत रविवारी ते बोलत होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभ्यासक प्रा. जयंत लेले होते. यावेळी प्रा. सुहास पळशीकर, संयोजक डॉ. वि. ल. धारूरकर, समन्वयक डॉ. बीना सेंगर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. सुहास पळशीकर यांनी ‘महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबई, विदर्भ विभागाचे स्थान’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. शोधनिबंधाचे सादरीकरण करताना ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर वेगळ्या विदर्भाचासुद्धा विषय चर्चेला आला. तेलंगणा हे स्वतंत्र राज्य निर्माण झाले. त्यानंतर पुन्हा वेगळ्या विदर्भाचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र, विदर्भ वेगळे झाले, तरी त्याचा महाराष्ट्राच्या एकूण सर्वच परिस्थितीवर फारसा परिणाम होईल, असे वाटत नाही. विदर्भाचे नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांना केवळ विदर्भाचेच पाठबळ आहे असेही नाही. त्यांना उर्वरित महाराष्ट्रातूनदेखील चांगले पाठबळ आहे. मुंबई आणि विदर्भ हे दोन्ही विषय भाषिक केलेले आहेत. मुंबईचे राजकारण भाषिक अस्मितेभोवती फिरविले जाते.
सायंकाळी या तीन दिवसीय परिषदेचा समारोप झाला. समारोप सत्रामध्ये ज्येष्ठ नाट्यकलावंत डॉ. मोहन आगाशे, आॅस्ट्रेलियाचे प्रा. जयंत लेले, अमेरिकेतील अ‍ॅरिझोन विद्यापीठाच्या प्रा. एन. एनसील, रशियातील मॉस्को विद्यापीठाच्या डॉ. एरिना रिस्कोवा, पतियाळा येथील वीरेंद्रपाल सिंग आदींची उपस्थिती होती. परिषदेचे संयोजक डॉ. वि. ल. धारूरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी नाट्यशास्त्र विभागातील प्रा. अशोक बंडगर लिखित ‘देवदासी’ एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. डॉ. मोहन आगाशे यासंबंधी म्हणाले की, सामाजिक परिवर्तनासाठी पोषक अशी ही एकांकिका आहे. एकांकिकेच्या माध्यमातून प्रभावी संदेश देण्यात आला आहे, या शब्दात त्यांनी एकांकिकेची प्रशंसा केली. उपस्थितांचे आभार डॉ. बीना सेंगर यांनी मानले.