शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
4
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
5
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
6
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
7
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
8
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
9
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
10
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
11
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
12
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
13
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
14
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
15
Baramati Election Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
16
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
17
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
18
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
19
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
20
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाबाबत केवळ बैठकावर बैठकाच..!

By admin | Updated: November 20, 2014 00:47 IST

जालना : जिल्ह्यात अल्पशा पावसामुळे खरिपापाठोपाठ रबीच्या हंगामालाही तडाखा बसला असून दुष्काळाजन्य स्थितीमुळे नागरिक हैराण झालेले आहेत.

जालना : जिल्ह्यात अल्पशा पावसामुळे खरिपापाठोपाठ रबीच्या हंगामालाही तडाखा बसला असून दुष्काळाजन्य स्थितीमुळे नागरिक हैराण झालेले आहेत. अशा काळात प्रशासनाकडून बैठकांवर बैठकाच सुरू असून प्रत्यक्षात कामे काहीच सुरू नसल्याने ग्रामीण भागात भयावह चित्र पाहावयास मिळत आहे.जिल्ह्याची आणेवारी फक्त ३९ पैसे आहे. सर्वच तालुक्यांची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. २०१२ मध्ये जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक दुष्काळ अनुभवला होता. त्यापाठोपाठ आता २०१४ मध्येही दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. विलंबाने व अल्पशा आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरिपाच्या पेरणीचे नियोजन बिघडले होते. तेव्हा शंभर टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी अल्पशा पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्याचा परिणाम म्हणून उत्पन्नात घट झाली. खरिपातील मुख्य पीक कापूस व सोयाबीनवर शेतकऱ्यांनी केलेला खर्चही अद्याप निघाला नाही. रबीच्या पेरण्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी असून जिल्ह्यात यावर्षी १५ नोव्हेंबरपर्यंत ३७८.१७ मि.मी. म्हणजे वार्षिक सरासरीच्या ५४ टक्के पाऊस झाला. २०१२ व २०१४ या दोन्ही वर्षात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. २०१३ हे वर्ष समाधानकारक पावसामुळे बऱ्यापैकी गेले असले तरी त्यातून आलेल्या उत्पन्नावर यावर्षी पुन्हा पाणी फेरले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे.आगामी काळात पाणीटंचाई, चाराटंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. त्यावेळी काय नियोजन करावयाचे, हे प्रशासनाकडून बैठकांच्या माध्यमातून ठरविले जात आहे. परंतु सद्यस्थितीत काहीच उपाययोजना होत नसल्याचा शेतकऱ्यांमधून सूर आहे. ग्रामीण भागात महावितरणकडून १२ तासांपेक्षा अधिक वेळेचे वीज भारनियमन सुरू आहे. अनेक गावांमध्ये रोहित्रे नादुरूस्त असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी वीज नाही. रोहित्रांची मागणी केल्यानंतर विविध ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जाते. अशा वेगवेगळ्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याही बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)४दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात कागदोपत्राशिवाय काहीच होत नाही. तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत अधिकाऱ्यांनी आतापासून प्रत्यक्षात ग्रामीण भागाचे दौरे केल्यास त्यांना खरी परिस्थिती लक्षात येईल, अशी प्रतिक्रिया काही जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केली.४जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी सर्वाधिक आणेवारी ४६ पैसे जाफराबाद तालुक्याची तर सर्वात कमी बदनापूर तालुक्याची ३४ आहे. त्या पाठोपाठ मंठा- ३८.१८, भोकरदन- ४०, घनसावंगी ४२.४८, जालना ४०.२५, अंबड ३८, परतूर ३६ पैसे अशी एकूण जिल्ह्याची आणेवारी ३९ पैसे आली आहे.