शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरची पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 13:50 IST

तांत्रिक त्रुटी, मागणीत वाढ; ९०० मि.मी. जलवाहिनीतून फक्त २६ एमएलडी पाणी वाढेल

छत्रपती संभाजीनगर : शहर पाणीपुरवठा योजनेचे काम १०० टक्के पूर्ण होण्यास डिसेंबर २०२६ उजाडणार आहे. त्यामुळे सध्याच्या १२००, ७०० व ९०० मि.मी. जलवाहिन्यांवरच शहराची तहान भागवावी लागेल. अलीकडच्या काळात ९०० मि.मी.ची जलवाहिनी २०० कोटींतून टाकण्यात आली असली तरी त्यातून ७५ ऐवजी फक्त २६ एमएलडी पाणी वाढणार असल्याने पाणीपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी, वाढलेली लोकसंख्या, क्षमतेपेक्षा जास्त मागणीमुळे शहरात पाणीबाणीचे चित्र पुढील दीड ते दोन वर्षे कायम राहील. 

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी पाणीपुरवठा वितरणातील त्रुटी आणि योजनेतील कामांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी पत्रकारांशी चर्चा करीत वस्तुस्थिती समोर आणली. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, मनपाचे अभियंता एम. एम. काजी, के. एम. फालक यांची उपस्थिती होती.

पत्रकारांनी प्रशासनास केलेले प्रश्नपत्रकार : नागरिकांना रोज पाणीपुरवठा दोन वर्षांनी तरी होईल काय?प्रशासन : सध्या तसे सांगता येणार नाही.

पत्रकार : राजकीय हस्तक्षेपामुळे विलंब होतोय का?प्रशासन : राजकीय दबाव नाही.

पत्रकार : पाच दिवसांत ६५० एमएलडी पाणी जाते कुठे?प्रशासन : नेटवर्क वाढले आहे, साठवण जलकुंभ नाही.

पत्रकार : मनपा, एमजीपीच्या तांत्रिक वादाचा भडका उडतोय का?प्रशासन : नाही, मनपा तांत्रिक एक्सपर्ट नाही, एमजेपी एक्सपर्ट आहे.

पत्रकार : एमजीपी मुख्य अभियंत्यांमुळे वाद वाढत आहे काय?प्रशासन : नाही, तसे काहीही नाही.

पत्रकार : मनपात प्रशासकीय राजवटीमुळे सर्व आलबेल आहे?प्रशासन : मनपात लोकप्रतिनिधी असते तर सर्व संतुलित राहिले असते.

मनपात, प्राधिकरणात वाद नाही९०० मि.मी. योजनेतून २६ एमएलडी पाणी वाढेल. ती पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शटडाऊन घेऊन पंपहाऊसचे काम करावे लागेल. नवीन याेजनेचा कंत्राटदार बदलणे शक्य नाही. दंड आकारणे, नोटीस देणे, दुसरा कंत्राटदार शोधणे या बाबी कागदावर छान वाटतात. परंतु, वस्तुस्थितीला धरून नाहीत. विद्यमान कंत्राटदार योजनेच्या कामास तयार आहे. निधीची अडचण नाही. कंत्राटदाराने योजनेच्या रोडमॅपमध्ये डिसेंबर २०२६ पर्यंत काम होईल, असे सांगितल्याचे मुख्य अभियंता पलांडे यांनी सांगितले.

मनपा सत्ताधाऱ्यांनी १२० कि. मी. नेटवर्क वाढविले२०१५ ते २०२० पर्यंतच्या मनपा सत्ताधाऱ्यांनी नो नेटवर्क एरियामध्ये १२० कि.मी. जलवाहिन्या टाकल्या. त्यावरील नळकनेक्शन रेकॉर्डवर नाही. रोजी पाणी देण्यासाठी वितरण व्यवस्था सक्षम नाही. २०२२ ते २४ पर्यंत ५ दिवसांआड पाणीपुरवठा झाला. २५०० मि.मी. जलवाहिनी योजनेच्या कामामुळे १२०० व ७०० मि.मी.च्या जलवाहिन्या वारंवार फुटत आहेत. परिणामी, पाणीपुरवठ्यात खंड पडत आहे. ८५ टक्के वसाहतींना पाणीपुरवठा होत असून, १५ टक्के भागांत अडचण आहे. ९०० मि.मी.च्या नवीन जलवाहिनीतून ७५ एमएलडी पाणी मिळाले तर समस्या सुटेल, असे मत मनपाचे अभियंता काजी यांनी मांडले.

सध्या किती पाणीपुरवठा होतो?सध्या १ लाख २८ हजार नळकनेक्शन आहेत. १३० एमएलडी पाणी रोज मिळते. २८० एमएलडी पाण्याची गरज आहे. ९०० मि.मी. नवीन जलवाहिनीचे डब्ल्यूटीपीचे बांधकाम बाकी आहे. ७०० मि.मी.ची जुनी जलवाहिनी बंद करून ९०० मि.मी.ची सुरू करावी लागेल. त्यामुळे शहराला १२०० व ९०० मि.मी. जलवाहिनीतून १४० एमएलडीच पाणी मिळेल. ९०० मि.मी. जलवाहिनीचे पंप बसविण्यासाठी ७०० मि.मी.वरील तांत्रिक यंत्रणा वापरण्यासाठी शटडाऊन घ्यावे लागेल. शटडाऊन घेणे सध्या शक्य नाही.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी