शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाविन्यपूर्ण उपक्रम! विद्यार्थ्यांनो इनोव्हेशन करा; ५ लाखांपर्यंत भांडवल मिळवा

By राम शिनगारे | Updated: August 18, 2023 20:13 IST

इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना नावीन्यता जोपासता येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : नवीन संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागांतर्फे स्टार्टअप धोरण जाहीर झाले आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी राज्य नावीन्यपूर्ण सोसायटीमार्फत महाराष्ट्र स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन केले आहे. यात विद्यार्थ्यांना पाच लाखांपर्यंत बीजभांडवल मिळणार आहे. इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना नावीन्यता जोपासता येणार आहे.

काय आहे इनोव्हेशन चॅलेंजराज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन केले आहे.

३१ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्जशैक्षणिक संस्थांसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट असून, विद्यार्थ्यांना अर्जासाठी १५ सप्टेंबर ही तारीख ठेवली आहे.

कोणाला करता येणार अर्जइनोव्हेशन चॅलेंजमध्ये पदवी, पदव्युत्तर, पदविकेचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सध्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त तीन जणांच्या समूहाला सहभाग नोंदवता येईल. तसेच अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे नावीन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करणार?इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी सुरुवातीला विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या संस्थांनी https://schemes.msins.in या पोर्टलवर नोंदणी करावी. त्यानंतर नोंदणी केलेला संस्थांमधील विद्यार्थ्यांना https://schemes.msins.in या पोर्टलवर नोंदणी करता येईल.

प्रत्येक जिल्ह्यातून १० विजेतेप्रत्येक जिल्ह्यातून १० विजेते निवडले जातील. त्यामध्ये ३० टक्के महिला आणि ५० टक्के विजेते हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून असतील.

सर्वोत्कृष्ट १०० संकल्पना निवडणारजिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या सर्वोत्तम दोन संकल्पनांमधून १०० संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल. त्यातून १० जणांची निवड जिल्हास्तरीय विजेत्यांसाठी होईल. जिल्हास्तरावर प्रत्येकी एक लाख, राज्यस्तरावर पाच लाखांचे भांडवल जिल्हास्तरावर निवड झालेल्या १० नवसंकल्पनांसाठी प्रत्येक एक लाख रुपयांचे तर राज्यस्तरावर १० विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बीजभांडवल देण्यात येणार आहे.

संधी हवी शहरातील उमेदवाराप्रमाणेच ग्रामीण भागातील सर्व घटकांतील उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिभा आहे. त्या विद्यार्थ्यांना संधीची आवश्यकता असते. अशी संधी या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे. त्याचा लाभ संस्था व उमेदवारांनी घ्यावा.- सुरेश वराडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद