शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

महागाईला आळा बसावा!

By admin | Updated: May 17, 2014 01:12 IST

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर होत असतानाच महिला दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ताजा निकाल बघत होत्या व घराघरांत प्रतिक्रियाही व्यक्त होत होत्या.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर होत असतानाच महिला दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ताजा निकाल बघत होत्या व घराघरांत प्रतिक्रियाही व्यक्त होत होत्या. ‘अब अच्छे दिन दूर नहीं, इंडियाचा कायापालट होणार, भारताचा विकास गुजरातसारखा व्हायला वेळ लागणार नाही, मोदी सरकार आल्यावर महागाई थोड्या-फार प्रमाणात का होईना कमी होईल,’ अशा प्रतिक्रिया, भावना व अपेक्षा महिला व्यक्त करीत होत्या. ‘अब की बार मोदी सरकार’ ही प्रचार सभांमधील घोषणा खरी ठरल्याचा घराघरांत आनंद व्यक्त होत होता. पेढे, लाडू वाटून व फटाके वाजवून या निकालाचे स्वागत होत असल्याचे दिसले. चांगले दिवस येणार मोदी सरकारमुळे देशाचा कायापालट होईल. महागाई कमी होईल अशी आशा आहे. मॉडेल गुजरात समोर असल्याने गुजरातसारखेच दिवस महाराष्ट्राला बघायला मिळतील, असे वाटते. -सुनंदा लालसरे अपेक्षापूर्ती करावी मोदींना निवडून देण्यामागे नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती या सरकारने कमी करून दिलासा द्यावा. पेट्रोल, डिझेल यांचे दर कमी व्हावेत, अशा अनेक अपेक्षांनी भाजपाला मतदारांनी पसंती दिली आहे. या अपेक्षांची पूर्तता आता मोदींनी करावी. -शैलेजा जाधव महिलांना सुरक्षा हवी गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उभे झाले आहेत. त्यांना एकटीने वावरणे जोखमीचे बनले आहे. महिलांना सुरक्षित वाटेल, अशी उपाययोजना नव्या सरकारने करावी, अशी अपेक्षा आहे. -दीप्ती जोशी सामान्यांचा विचार व्हावा सामान्य मतदारांनी एवढी वर्षे काँग्रेस सरकारचा अनुभव घेतला आहे. त्याचबरोबर गुजरातमध्ये झालेल्या विकास कामांविषयी माहिती घेतली आहे. ते बघून मोदी सरकारच्या येण्याने फक्त सरकारमध्येच नाही तर संपूर्ण भारतात बदल अपेक्षित आहे. सामान्य माणसाच्या हिताचा सर्वतोपरी विचार व्हावा. -श्रुती वाघमारे मत कामी आले आमचे मत वाया गेले नाही. आम्ही खूप अपेक्षेने सरकार बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्या अपेक्षा आता मोदी सरकारकडून पूर्ण व्हाव्यात. मोदी सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना समाधानाने जगता यावे. -मनीषा पाटील चित्र बदलण्याची आशा सलग दहा वर्षे काँग्रेस सरकारचा अनुभव घेतला. अपेक्षित सुधारणा होऊ शकल्या नाहीत; परंतु आता चित्र बदलेल, अशी आशा आहे. महागाई कमी करणे, गॅस सिलिंडरवर अनुदान, शिक्षणाचा खर्च सुसह्य होणे तसेच महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील विचार नक्कीच केला जाईल. त्यामुळे जनतेचा हा कौल नवी दिशा देईल, असे वाटते. -लक्ष्मी साखरे प्रश्न सोडविले जावेत वाढती महागाई, महिलांची सुरक्षा, गॅस, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी काही उपाय लवकरात लवकर योजले जावेत, अशी अपेक्षा आहे. -जिजाबाई पाटील