शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर पॅटर्नमुळे जलस्त्रोतांच्या साठ्यात वाढ

By admin | Updated: September 2, 2014 01:50 IST

सुमेध वाघमारे, तेर २०१३ च्या भीषण दुष्काळी काळात लेडिज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई पाटील यांच्या पुढाकारातून तेर (ता़उस्मानाबाद) परिसरात

सुमेध वाघमारे, तेर२०१३ च्या भीषण दुष्काळी काळात लेडिज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई पाटील यांच्या पुढाकारातून तेर (ता़उस्मानाबाद) परिसरात तेरणा नदीपात्रात शिरपूर पॅटर्न राबविण्यात आला. गत आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे शिरपूर उपक्रमांतर्गत खोदलेल्या सुमारे १३ फुट खोल खड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, परिसरातील जलस्त्रोतांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे़ परिणामी याचा गावकऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनाही मोठा लाभ होणार आहे़जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना तीन-चार वर्षात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. याला तेरही अपवाद नव्हते. या दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई पाटील यांच्या संकल्पनेतून माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेर येथील तरेणा नदीपात्रात शिरपूर पॅटर्नचे काम हाती घेण्यात आले़ २०१३ च्या गुढीपाडव्यादिनी या उपक्रमास माजी खा़ डॉ़ पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला़ लोकसहभागातून हे काम ३ महिन्यात पूर्ण करण्यात आले़ वाळूमिश्रीत मातीच्या सहाय्याने दोन्ही बाजूंनी बांध मजबुतीकरण करण्यात आले़ हे काम पूर्ण झाल्यानंतर गतवर्षी अपेक्षित पाऊस न झाल्याने या पॅटर्नचा अपेक्षित परिणाम दिसून आला नव्हता़ यंदा मात्र, गत आठ दिवसांपासून सातत्याने पाऊस पडल्याने नदीपात्रातील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे़ त्यामुळे परिसरातील जवळपास पाच किलोमीटर अंतरावरील जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत प्रतिवर्षापेक्षा अधिकची वाढ झाली असून, याचा शेतकऱ्यांसह पशुपालकांना मोठा लाभ होताना दिसत आहे़ शिवाय गावातील अनेकांच्या कुपनलिकांमधील पाणीपातळीतही चांगली वाढ झाली आहे़ शिरपूर पॅटर्नमुळे तेर परिसराला मोठा लाभ होत असून, हा आदर्शवत पटर्न इतर गावात राबवून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे़अशी धावली वाहनेतेर गावानजीक येथील तेरणा नदीपात्रात तीन महिन्यात शिरपूर पॅटर्नचे काम पूर्ण करण्यात आले आहे़ हे काम करण्यासाठी तब्बल ७५० ट्रॅक्टर, ३ पोकलेन, २ जेसीबी अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती़ या कामासाठी जवळपास ५० लाख रूपये खर्च करण्यात आला असून, तब्बल ७२ हजार मेट्रीक टन वाळू मिश्रित गाळाचा उपसा करण्यात आला होता.सातत्याने जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत आहे़ शिरपूर पॅटर्न राज्यात गाजत असून, त्याद्वारे जलस्त्रोतांच्या पाणीपातळीतही चांगली वाढ झाली आहे़ त्या धर्तीवर तेर येथे शिरपूर पॅटर्नचा उपक्रम राबविण्यात आला आहे़ यंदा चांगला पाऊस झाल्याने या उपक्रमाचा पाच किलोमीटर परिसरातील शेतकरी, सर्वसामान्यांना लाभ होत असून, यापुढील काळात इतर गावात हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई पाटील यांनी सांगितले़