शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय शेतीतून मिळविले लाखोंचे उत्पन्न

By admin | Updated: December 16, 2015 23:33 IST

मोहन बारहाते, मानवत कोल्हावाडी येथील दिगंबर भिसे या शेतकऱ्याने सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न घेत शेतकऱ्यांना मानसिक बळ व प्रेरणा देण्याचे काम केले आहे़

मोहन बारहाते, मानवत
सततचा दुष्काळ त्यामुळे जमिनीतील खोल गेलेली पाणी पातळी, रासायनिक खते आणि किटक नाशकांमुळे कमी झालेली उत्पादन क्षमता यावर मात करीत कोल्हावाडी येथील दिगंबर भिसे या शेतकऱ्याने सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न घेत शेतकऱ्यांना मानसिक बळ व प्रेरणा देण्याचे काम केले आहे़
कोल्हावाडी येथील दिगंबर भिसे यांनी २०१४ मध्ये जी-९ या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ऊतीसंवर्धित केळीची दोन एकरात लागवड केली़ ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली़ केळीला कुठलाही रासायनिक खत न वापरता केवळ शेणखताचा वापर केला़ परिणामी या पिकास चांगले उत्पादन झाले़ दोन एकरात ६०० क्विंटल केळीचे उत्पादन झाले़ तर केळीला ८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला़ या तून खर्च वजा जाता त्यांना ३ लाख ५० हजार रुपयांचा नफा मिळाला़ यावर्षी त्यांनी पीलबाग राखून ठेवला़ त्यातील ५० टक्के झाडांची वेन झाली आहे़ त्याच्याच बाजुला दोन एकर क्षेत्रफळावर कोबीची लागवड केली असून, कोबीचा एक गड्डा दोन किलो वजनाचा असून, या गड्डयाला परभणी येथील बाजारपेठेत २५ रुपये किलोचा भाव मिळत आहे़ या पिकातूनही त्यांना अडीच लाख रुपयांचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे़ याशिवाय त्यांनी टोमॅटोचीही लागवड केली आहे़ ठिबक सिंचनाचा वापर करून कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे़ शेतकरी दिगंबर भिसे यांनी शेतीला सेंद्रीय खत मिळावे, यासाठी जाफर जातीच्या सहा म्हशी धुळे येथून खरेदी केल्या आहेत़ भिसे यांच्याकडे १५ जनावरे आहेत़
तंत्रज्ञान व प्रयत्नांची जोड आवश्यक
निसर्गाच्या लहरीपणाला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी केवळ नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून चालणार नाही़ बदलत्या परिस्थितीत पिकातही बदल करावा लागणार आहे़ या शिवाय उपलब्ध साधनसामुग्री, पाणी व जोड धंदा स्वीकारल्यास शेतीतूनही चांगले उत्पादन काढता येते़ यासाठी तंत्रज्ञानाला प्रयत्नाची जोड आवश्यक आहे़
-दिगंबर भिसे,कोल्हावाडी