शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीच्या धोरण निश्चितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!

By admin | Updated: August 5, 2015 00:42 IST

दहीहंडी उत्सवासाठी गोविंदा पथकांच्या सरावाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मात्र तरीही अंतिम मसुदा सुपुर्द करून दहीहंडी धोरण निश्चितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत

मुंबई : दहीहंडी उत्सवासाठी गोविंदा पथकांच्या सरावाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मात्र तरीही अंतिम मसुदा सुपुर्द करून दहीहंडी धोरण निश्चितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे ऐन उत्सवाच्या तोंडावर धोरणाबाबत गोविंदा पथकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.दहीहंडी समन्वय समिती आणि शासकीय समितीने जुलै महिन्यात दहीहंडीचा अंतिम मसुदा शासनाकडे पाठविला. परंतु, यावर अजूनही ठोस पाऊल न उचलता मसुदा ‘जैसे थे’ परिस्थितीत आहे. त्यामुळे गोविंदाचे वय आणि हंडीच्या उंचीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दहीहंडीच्या धोरण निश्चितीवर आॅगस्टच्या मध्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती स्वाती पाटील यांना शासनाकडून देण्यात आली. त्यामुळे या धोरणाच्या माध्यमातून उत्सवाबाबत संभ्रम निर्माण करून त्याचे राजकीय भांडवल होण्याचीच शक्यता आहे. तरी असे न करता, अंतिम टप्प्यात असलेले हे धोरण शासनाने लवकरात लवकर जाहीर करून दहीहंडी मंडळ आणि गोविंदांच्या मनातील शंकांचे निरसन करावे, असेही पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दहीहंडीचे धोरण ‘त्रिशंकू’ अवस्थेत असताना दुसरीकडे मात्र काही नामांकित गोविंदा पथकांनी उंचच्या उंच थर लावण्यासाठी कसून सराव सुरू केला आहे. शिवाय, या थरांवर चढण्यासाठी एक्क्यांचा शोधही सुरू झाला आहे. शहर-उपनगरातील अनेक गोविंदा पथकांचे सराव मैदानात किंवा थेट डांबरी रस्त्यांवर सुरू आहेत, त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षेचा मोठा अभाव दिसून येत आहे. शिवाय, गेल्या काही वर्षांपासून सरावादरम्यान गोविंदा जखमी होणे आणि मृत्यू होण्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा गोविंदा पथके गेल्या वर्षीचाच कित्ता गिरवणार की फडणवीस सरकार या जीवघेण्या स्पर्धेला आळा घालणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)