शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ पितात पावसाचे आरोग्यदायी पाणी...

By admin | Updated: June 14, 2016 00:09 IST

औरंगाबाद : पावसाचे पाणी पिऊन तहान भागविण्याचा अनोखा प्रयोग गारखेड्यातील श्रीकांत शहा हे गेल्या वर्षभरापासून करीत आहेत.

औरंगाबाद : पावसाचे पाणी पिऊन तहान भागविण्याचा अनोखा प्रयोग गारखेड्यातील श्रीकांत शहा हे गेल्या वर्षभरापासून करीत आहेत. चार जणांच्या कुटुंबियांना वर्षभर पुरेल इतके पावसाचे पाणी साठविण्याचा संकल्प त्यांनी केला असून, त्यासाठी छतावर दहा हजार लिटर क्षमतेच्या पाच टाक्याही त्यांनी बसविल्या आहेत. पावसाचे पाणी पिण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचेही त्यांनी प्रयोगशाळांमधील चाचण्यातून दाखवून दिले आहे. गारखेड्यातील कडा कार्यालयाजवळ शहा यांचे निवासस्थान आहे. जैन मुनी आचार्य उग्रदित्यचार्य यांनी नवव्या शतकात लिहिलेला ‘कल्याणकारकम’ हा ग्रंथ त्यांच्या वाचनात आला. पावसाचे पाणी योग्य पद्धतीने साठवून त्याचा पिण्यासाठी वापर केल्यास ते अमृतासमान असल्याचा उल्लेख या ग्रंथात करण्यात आला आहे. हा ग्रंथ वाचल्यानंतर शहा यांचा पावसाच्या पाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. गेल्या वर्षी साठविलेल्या दोन हजार लिटर पाण्याचा ते अजूनही वापर करीत आहेत. शिळे न होणारे पाणी माती व सूर्यकिरणांचा संपर्क होऊ न देता छतावर पडणारे पावसाचे पाणी योग्य पद्धतीने साठवून त्याचा पिण्यासाठी नियमित वापर करता येतो. विशेष म्हणजे हे पाणी कधीच शिळे होत नाही, तसेच त्याला वासदेखील येत नसल्याचे शहा यांचे म्हणणे आहे. औद्योगिक वसाहतीच्या परिसरात पडणारे पावसाचे पाणी मात्र, आरोग्यास हानी पोहोचवू शकते. त्यामुळे ते जमा करू नये, असा सल्लाही ते देतात.