शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींची शाळा आजपासूनच

By admin | Updated: June 13, 2016 00:49 IST

औरंगाबाद : नवीन शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून आरंभ होत असला तरी गुरुजींची शाळा मात्र, उद्यापासूनच (१३ जून) भरणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशीच

 

औरंगाबाद : नवीन शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून आरंभ होत असला तरी गुरुजींची शाळा मात्र, उद्यापासूनच (१३ जून) भरणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशीच सर्व विद्यार्थी गणवेशात हजर झाले पाहिजेत. यासाठी विद्यार्थ्यांना उद्यापासून दोन दिवस गणवेश वाटप केले जाणार आहेत. याशिवाय शाळा परिसर तसेच वर्गखोल्यांची साफसफाई, सजावट तसेच विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी गुरुजींना करावी लागणार आहे. यापूर्वी दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकांचे वितरण केले जायचे. मात्र, यंदापासून त्यामध्ये बदल केला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी गणवेशात शाळेत आले पाहिजे. यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी एक तर पालकांना शाळेत बोलावून घ्यावे किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन गणवेश वाटप करायचे आहेत. त्यानुसार दहा दिवसांपूर्वीच केंद्रनिहाय गणवेशाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. यासंदर्भात शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व शाळांना शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना १२ जूनपासून गावातील तसेच शहरातील ६ ते १४ वर्ष वयोगटातील दाखलपात्र व शाळाबाह्य विद्यार्थ्यांची यादी करावी लागणार आहे. पहिलीतील दाखलपात्र विद्यार्थ्यांची यादी गावाच्या व शाळेच्या दर्शनी फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्यामुळे दाखलपात्र विद्यार्थ्यांबद्दल पालकांमध्ये जनजागृती होईल, अशी अपेक्षा आहे. (पान २ वर) शाळा सुरू झाल्यानंतर सलग पाच दिवस शिक्षणाच्या पालखीचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत बालकांच्या मोफत व सक्तीच्या अधिकार कायद्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ४या उपक्रमाच्या माध्यमातून पालकांना त्यांच्या मुलांना शाळेत दाखल करण्याबाबत आवाहन करावे. भेटी दिलेल्या पालकांच्या स्वतंत्र नोंदी ठेवाव्यात. दोन दिवस अगोदरच १३ ते १५ जून या कालावधीमध्ये शाळा सुरू होत असल्याबाबत तसेच दाखलपात्र मुलांना आणि नियमित मुलांना शाळेत पाठविण्यासाठी दवंडी देण्याचे शिक्षण विभागाचे आदेश आहेत. यासंबंधीची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. गावात फलक लेखन करून शाळा शुभारंभाबाबत सविस्तर सूचना लिहिणेही बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये पटनोंदणी व उपस्थितीचे १०० टक्के उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळेच शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ नावीन्यपूर्ण पद्धतीने करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक व समाजाच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळा शुभारंभाबाबत विविध स्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.