शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

सहा लाख मे.टन ऊस उभा

By admin | Updated: June 28, 2014 01:14 IST

पाथरी : येथील रेणुका शुगर साखर कारखाना कार्यक्षेत्रात यावर्षी सहा लाख मे. टनापेक्षा अधिक उसाची उपलब्धता आहे. चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरू होतो की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

पाथरी : येथील रेणुका शुगर साखर कारखाना कार्यक्षेत्रात यावर्षी सहा लाख मे. टनापेक्षा अधिक उसाची उपलब्धता आहे. चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरू होतो की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आतापासूनच चिंता वाढली आहे.
पाथरी तालुका हा ऊस क्षेत्राचे भांडार म्हणून ओळखला जातो. मागील पंचवीस वर्षापासून या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. या भागातील सहकारी तत्वावरील कारखाना सुरुवातीच्या कालावधीत स. गो. नखाते यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थितरित्या चालला. परंतु नंतरच्या कालावधीत कारखान्याला राजकारणाची घरघर लागली आणि आज या कारखान्याची अत्यंत वाईट अवस्था झाली.
२००८ साली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा कारखाना परभणीच्या रत्नप्रभा शुगरला चाालविण्यासाठी ताब्यात देण्यात आला. कालांतराने रत्नप्रभा ही संस्था कर्नाटकातील रेणुका शुगरकडे वर्ग झाल्याने रेणुका शुगरच्या माध्यमातूून हा कारखाना चालविण्यात येतो. चार गळीत हंगाम रेणुका शुगरने यशस्वीरित्या चालविले खरे. परंतु गतवर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊ शकला नाही. कामगार आणि व्यवस्थापनातील वाद विकोपाला गेल्याने कारखान्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले. गतवर्षी या भागात चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी ०३१०२ या उसाच्या नवीन वाणाची ५ हजार रुपये प्रतिटन खर्च करून ऊस लागवड केला. या भागात चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये ६ लाख मे.टनपेक्षा अधिक ऊस उपलब्ध आहे. यामुळे चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरू करणे आवश्यक आहे. गळीत हंगाम सुरू झाला नाही तर या भागातील शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी अनेक यातना सहन कराव्या लागणार आहेत. (वार्ताहर)
गतवर्षीच्या उसाचा वाढीव हप्ता नाही
मराठवाड्यातील काही कारखान्यांनी गतवर्षी गाळप झालेल्या उसाला २०० रुपये वाढीव हप्ता दिला. परंतु या भागातील या कारखान्याने गतवर्षी गाळप झालेल्या उसाला वाढीव हप्ता दिला नाही. त्याच बरोबर या भागातून बाहेरील कारखान्यास गाळपास गेलेल्या उसालाही वाढीव हप्ता देण्यात आला नाही.
तातडीने निर्णय होणे आवश्यक
कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्याचा कालावधी कमी राहिला आहे. यावर्षी गळीत हंगाम सुरू करायचा असेल तर याबाबत तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. अन्यथा ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता वाढणार आहे.
आंदोलनास गती गरजेची
रेणुका शुगर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी माजी आ. हरिभाऊ लहाने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याची भूमिका घेतली असली तरी कारखाना सुरू होईपर्यंत हे आंदोलन गतिमान होणे आवश्यक आहे. कारखान्यासाठी शेतकरी कधीही एकत्र येतात, असा पूर्वीचा अनुभव आहे.