शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
2
Top Marathi News LIVE Updates: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
4
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
5
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
6
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
7
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
8
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
9
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
10
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
11
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
12
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
13
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
14
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
15
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
16
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
17
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
18
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
19
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
20
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

गावात नळयोजना असताना घशाला कोरड

By admin | Updated: May 13, 2014 01:06 IST

इब्राहिम जहागीरदार , कुरूंदा राष्टÑीय पेयजल योजनेतून नळयोजनेचे मार्गी लागलेले काम कागदावरच राहिले आणि नळयोजनेचे पाणी गावात आणण्यासाठी पुरेसे प्रयत्न झाले नाहीत.

 इब्राहिम जहागीरदार , कुरूंदा राष्टÑीय पेयजल योजनेतून नळयोजनेचे मार्गी लागलेले काम कागदावरच राहिले आणि नळयोजनेचे पाणी गावात आणण्यासाठी पुरेसे प्रयत्न झाले नाहीत. अशा स्थितीत नळयोजनेच्या कामाचे नियोजनाअभावी नळयोजना असून कुरूंदावासियांना पाणी मिळालेले नाही. परिणामी गावासाठी योजना असूनही ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडली आहे. १५ हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या कुरूंद्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. घरोघरी बोअर व हातपंप असल्याने सध्यातरी पाणी टंचाई भेडसावत नाही. यंदा अधिक पाऊस पडल्यामुळे पाणीपातळी खालावली नाही. ३० वर्षांपूर्वीची नळयोजना पूर्णत: मोडकळीस आल्यानंतर या गावाचा २२ गाव नळ योजनेमध्ये समावेश करण्यात आला. युती सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेली ही नळयोजना आघाडी सरकारच्या काळात मार्गी लागली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर जेमतेम दोन महिने पाच दिवसाआड पाणी अर्ध्या गावाला मिळाले. त्यानंतर २२ नळ योजना देखील कोलमडली. त्यामुळे शासनस्तरावर नव्याने राष्टÑीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली. ४५ लाख रुपयांच्या निधीमधून सायफन कालव्यावर विहिर अधिग्रहण करून २२ गाव नळयोजनेच्या पाण्याच्या टाकीत पाणी आणण्यात आले. हे पाणी जुन्या पाईपलाईनद्वारे गावात सोडण्यात येणार होते; परंतु २२ गाव नळयोजनेतील पाईपलाईन जागो-जागी फुटल्याने गावात पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे नळयोजना मार्गी लागलेली असताना देखील कुरूंदावासियांना पाणी मिळालेले नाही. नळयोजना मार्गी लागून जवळपास एका वर्षाचा कालावधी होत आहे. उन्हाळा संपत आला तरी नळ योजनेचे पाणी आलेले नाही. नवीन पाईप करण्यासाठी व दुरूस्तीसाठी निधीची मागणी कुरूंदा ग्रा.पं. ने केली होती. त्याची सध्यातरी दखल घेतल्या गेली नाही. कुरूंदा गावासाठी तीन नळयोजना आखण्यात आल्या. त्यापैकी दोन नळयोजना कायमच्या बंद पडल्या आहेत. सध्याची राष्टÑीय जल नळयोजना पाईपलाईनच्या नियोजनाअभावी कुचकामी ठरली आहे. गावाची लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याचा मुबलक साठा पाहिजे. नळयोजना मार्गी लागली तरी पाण्याचा नियोजन आराखडा शासनस्तरावर आखण्यात आला नाही. नेतेमंडळीचे झाले दुर्लक्ष कुरूंद्यातील नळ योजनेकडे प्रशासनासह नेतेमंडळी देखील साफ दुर्लक्ष करीत आहेत. पाण्याचा मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी निधी आणण्यास अपयश आल्याने राष्टÑीय जल नळयोजना अडगळीत पडली आहे.