शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. ची जबाबदारी वाढविणार

By admin | Updated: June 28, 2014 01:15 IST

बीड: पीडित महिलांसाठी शासनाने सुरु केलेल्या ‘मनोधैर्य’ योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचावा व अत्याचाराला पायबंद लागावा यासाठी आता ग्रामपंचायतींची जबाबदारी वाढविली जाणार आहे़

बीड: पीडित महिलांसाठी शासनाने सुरु केलेल्या ‘मनोधैर्य’ योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचावा व अत्याचाराला पायबंद लागावा यासाठी आता ग्रामपंचायतींची जबाबदारी वाढविली जाणार आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी पीडितांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी नियमित बैठक घेतली जाणार असल्याचे सांगितले़‘लोकमत’मध्ये गुरुवारी ‘मनोधैर्यासाठी टाहो’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते़ त्याची जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी गंभीर दखल घेतली़ जिल्हाधिकारी राम यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पीडितांच्या बाबतीत प्रशासन गंभीर आहे़ त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही़ २ आॅक्टोबर २०१३ नंतर अत्याचार झालेल्या पीडितांना आर्थिक मदत तातडीने दिली जाईल असे ते म्हणाले़ महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतात? यासाठीही प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले़ गावपातळीवर ग्रामपंचायतींनी महिला अत्याचार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत़ त्यासाठी ग्रामपंचायतींची जबाबदारी वाढविली जाणार आहे़ ग्रामपंचायतींनी अशी प्रकरणे पोलीसांच्या मदतीने संवेदनशीलपणे हाताळावीत असे आवाहनही त्यांनी केले़पीडितांना मनोधैर्य योजनेचा लाभ वेळेतच मिळाला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)व्यापक समिती नेमणारपीडितांच्या न्याय- हक्कासाठी जिल्हास्तरावर व्यापक समिती नेमण्यात येणार आहे़ यात पोलीस अधीक्षक, महिला व बालविकास अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, वकील, महिला कार्यकर्त्या व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात येईल़ ही समिती पीडितांना न्याय देण्याबरोबरच संभाव्य अत्याचार टाळण्यासाठी काम करेल, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली़