शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाºयांना प्रशासन चालविता येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:33 IST

शेतकºयांच्या पीकविम्या संदर्भात राज्य शासनाने चार दिवसांत चार आदेश काढले़ प्रशासनातील अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार सातत्याने निर्णय बदलले़ त्यामुळे सत्ताधाºयांना प्रशासन चालविता येईनासे झाले आहे़ त्याचा शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागला असल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकºयांच्या पीकविम्या संदर्भात राज्य शासनाने चार दिवसांत चार आदेश काढले़ प्रशासनातील अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार सातत्याने निर्णय बदलले़ त्यामुळे सत्ताधाºयांना प्रशासन चालविता येईनासे झाले आहे़ त्याचा शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागला असल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली़काँग्रेसचे उपाध्यक्ष खा़ राहुल गांधी ८ सप्टेंबर रोजी परभणी दौºयावर येत आहेत़ यानिमित्त होणाºया कार्यक्रमाची माहिती देण्याकरीता शहरातील मास्टर कॅफे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण म्हणाले की, शेतकºयांच्या पीकविम्या संदर्भात राज्य शासनाने चार दिवसांत चार वेगवेगळे आदेश काढले़ यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला़ मुळातच या संदर्भातील प्रक्रिया व्यवस्थित राबविली गेली नाही़ अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार सत्ताधाºयांनी असे निर्णय घेतले़ त्यामुळे त्यांना प्रशासन कसे चालवायचे हेच कळत नाही, असेही ते म्हणाले़ राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून, ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली गेली़ प्रत्यक्षात ५ हजार कोटींपेक्षा कमी कर्जमाफी झाली आहे़ त्यामुळे राज्य सरकारची ही आकडेवारी फसवी आहे़ शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ही काँग्रेसची पूर्वीपासून मागणी होती व आजही ती कायम आहे़ कर्जमाफीचे अर्ज भरतानाही अनेक अटी घातल्या़ त्यामध्ये जातीचा उल्लेख केला गेला़ राज्य शासन जात पाहून शेतकºयांना कर्जमाफी देणार आहे की काय? असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित झाल्याचे ते म्हणाले़ परभणी वगळता मराठवाड्यातील सात जिल्ह्यातील मागच्या वेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडणूक लढविलेल्या उमेदवारांचा व काँग्रेसच्या पदाधिकाºयांचा मेळावा ८ रोजी सकाळी ९़३० वाजता नांदेड येथे होणार असून, दुपारी १़३० वाजता परभणी येथे संघर्ष सभेचे आयोजन करण्यात आले आहे़ काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत़ शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी, पीकविमा, जीएसटी, नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने दिलेला अहवाल, प्रदेश काँग्रेस कमिटीने सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतलेली भूमिका या सर्व बाबींवर खा़राहुल गांधी हे मार्गदर्शन करणार आहेत, असेही ते म्हणाले़ यावेळी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करताना त्यांनी दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येच्या तपासाकडे राज्य शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला़ यावेळी माजी खा़ तुकाराम रेंगे, सरचिटणीस विनायकराव देशमुख, श्याम उमाळकर, जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी आ़ सुरेश देशमुख, सत्संग मुंढे आदींची उपस्थिती होती़