शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्यांवर संक्रांत

By admin | Updated: September 23, 2014 01:34 IST

मदन बियाणी , कनेरगाव नाका आॅक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात सलग चार दिवस सुट्यांची मेजवाणी शासकीय कर्मचाऱ्यांना लाभली खरी परंतु विधानसभा निवडणुकीमुळे सुट्यांचा हा आनंद


मदन बियाणी , कनेरगाव नाका
आॅक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात सलग चार दिवस सुट्यांची मेजवाणी शासकीय कर्मचाऱ्यांना लाभली खरी परंतु विधानसभा निवडणुकीमुळे सुट्यांचा हा आनंद हिरावणार असेच चित्र दिसून येत आहे. सुट्या असूनही त्यांचा उपभोग घेता येणार नसल्याचे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण आहे.
शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना २ आॅक्टोबरला गांधी जयंती, ३ आॅक्टोबरला दसरा, तर ५ आॅक्टोबरला रविवार अशा ३ दिवसांच्या सुट्यांचा योग जुळून आला आहे. ४ आॅक्टोबर शनिवार असल्यामुळे या दिवसाची रजा टाकल्यास चाकरमान्यांना सलग ४ दिवस सुट्यांचा आनंद लुटता येऊ शकतो. काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तर जेमतेम महिनाभरापूर्वी या सुट्यांमध्ये पर्यटन अथवा नातेवाईकांच्या गावाला जाण्याचे नियोजनही करून ठेवले आहे. मात्र नेमक्या याच कालावधीत विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजल्याने शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांसह निवडणूक कामामध्ये ड्युटी लागलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आनंदावर तर विरजन पडले आहे. प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, राज्य शासनाचे इतर अधिकारी व कर्मचारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही या निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याने नाईलाजाने त्यांनाही या सुट्यांचा आनंद लुटण्याचा मोह सोडावा लागणार असे दिसते. निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना १५ आॅक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीच्या कामकाजाची तयारी म्हणून दोन दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यापैकी पहिले प्रशिक्षण सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दुसरे प्रशिक्षण आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येण्यार आहे. परिणामी, महसूल कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ या सर्वाचाही रसभंगच झाला, असचे म्हणावे लागेल. सुट्ट्यांच्या या योगा-योगामुळे खरे तर दिवाळीपूर्वीच एका छोट्या सहलीच्या मेजवानीचा आनंद लुटता आला असता. मात्र निवडणुकीच्या धामधुमीत हा आनंद लोप पावणार असल्याने शासकीय कर्मचारी नाराज झाले आहेत. त्यामुळे सुट्ट्यांचा हा मोठा काळ अनुभवताना ‘कही खुशी कही गम’ अशीच अवस्था कर्मचारी व अधिकाऱ्यांची झाली आहे.