शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

जलस्त्रोत अधिग्रहणांची रक्कम तात्काळ द्या

By admin | Updated: June 4, 2014 01:32 IST

उस्मानाबाद : शासनाकडून पाणीटंचाई निवारणासाठी प्राप्त झालेली रक्कम संबधित यंत्रणेच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

उस्मानाबाद : शासनाकडून पाणीटंचाई निवारणासाठी प्राप्त झालेली रक्कम संबधित यंत्रणेच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. ती रक्कम तात्काळ संबधित मालक व शेतकर्‍यांना उपलब्ध करुन द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यंत्रणेला दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात टंचाई परिस्थितीबाबत सोमवारी विशेष कार्यगटाची आढावा बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी नारनवरे यांनी हे निर्देश दिले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जे. टी.पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, कळंब, भूम, उमरगा येथील उपविभागीय अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता तांगडे, महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता भालेराव, सरकारी अभियोक्ता व्ही. बी. शिंदे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात किती विंधन विहिरींचे कामे सुरु आहेत व किती बंद आहेत याचा अभियंतानिहाय आढावा सादर करावा. पुढील काळात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन जून, जुलै आणि आॅगस्ट २०१४ साठीचे नियोजन करणे, पावसाळयात पाणी वाहून जाऊ नये यासाठी पाणी पुनर्भरण कामांचा आराखडा तयार करणे, सिंमेट नाला बंधारेच्या कामांचे टेंडरची प्रक्रिया पूर्ण करुन कामे सुरु करणे, रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी करुन घेणे, आदीनचा जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी आढावा घेऊन संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. (प्रतिनिधी) ६३ टँकर, १४४ अधिग्रहणे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी या परिस्थितीत जिल्ह्यात ६० गावे व ९ वाडयात मिळून ६३ टँकरणे पाणी पुरवठा केला जात आहे. तर ९६ गावात १४४ विहिर बोअरचे अधिग्रहण करुण पाणीटंचाईवर मात करण्यात येत असल्याचे सांगितले.