शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
5
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
6
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
9
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
10
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
11
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
12
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
13
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
14
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
15
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
16
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
17
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
18
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
19
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
20
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
Daily Top 2Weekly Top 5

गेटकेन उसावरच दारोमदार!

By admin | Updated: December 1, 2014 00:48 IST

गंगाराम आढाव , जालना जिल्ह्यात एकून साखर कारखान्यांपैकी पाच कारखान्यांचे यावर्षीच्या गळीप हंगामात बॉयलर पेटले असून या कारखान्यांसमोर आता उस आणावा तरी कोठून असा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे.


गंगाराम आढाव , जालना
जिल्ह्यात एकून साखर कारखान्यांपैकी पाच कारखान्यांचे यावर्षीच्या गळीप हंगामात बॉयलर पेटले असून या कारखान्यांसमोर आता उस आणावा तरी कोठून असा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे.
दरम्यान, या पाच कारखान्यांंचे गाळपाचे उद्दीष्ट सुमारे २० लाख मे. टन एवढे असून प्रत्यक्षात जिल्ह्यात सुमारे साडेपाच ते सहा लाख मे. टन ऊस उभा आहे. त्यामुळे गाळपाचा पल्ला गाठण्याकरिता या पाचही कारखान्यांना मोठी रस्सीखेच करावी, लागेल, अशीच चिन्हे आहेत.
जिल्ह्यात चार सहकारी आणि दोन खाजगी साखर कारखाने आहेत. त्यापैकी जालना सहकारी साखर कारखाना (रामनगर) हा बंद आहे. तो पूर्वीच अवसायानात निघाला असून त्याचा लिलावही झालेला आहे. परंतु तो अद्याप कार्यान्वित झाला नाही. अन्य पाच कारखाने यावर्षीच्या गळीत हंगामासाठी सज्ज असून त्यांचे बॉयलर पेटून प्रत्यक्ष गाळपासही सुरुवात केली आहे. परंतु या पाचही कारखान्यांसमोर ऊसाचा मोठा पेच उभा राहिल, अशी चिन्हे आहेत. जिल्ह्यात २० हजार ४०१ हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहेत. त्यापैकी २०१३ - १४ साली ३९ टक्के म्हणजे ७ हजार ९९२ हेक्टरवर उसाची लागवड झालेली आहे. अपूरा पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. असे असले तरी या वर्षी जिल्ह्यात दोन कारखान्यांची भर पडली आहे. त्यात परतूर येथील बंद पडलेला बागेश्वरी साखर कारखाना, पुणे येथील एका खाजगी कंपनीने लिलावात विकत घेतला. देखभाल दुरुस्तीनंतर हा कारखाना यावर्षी पहिल्यांदाच गाळप करीत आहेत. या कारखान्याने ३ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्या तुलनेत मात्र कार्यक्षेत्रात २३६ हेक्टरवर म्हणजे १५ ते २० हजार मे. टन ऊस उभा आहे.
भोकरदन येथील रामेश्वर सहकारी साखर कारखान्याने ४ लाखाचे उद्दीष्ट ठवेलेले आहे. मात्र कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ३८१ हेक्टर क्षेत्रात म्हणजेच फक्त २२ ते२५ हजार टन ऊस उभा आहे.
घनसावंगी तालुक्यात तीन साखर कारखाने आहेत. त्यात समर्थ आणि सागर सहकारी कारखाना या दोन्ही कारखान्यांनी एकूण ८ लाख टन उस गाळपाचे उद्दीष्ट ठेवलेले आहे. तर समृद्धी ह्या खाजगी कारखान्याने ४ लाख टन उस गाळपाचे उद्दीष्ट ठवलेले आहे. परंतु या तिन्हीही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात फक्त ६ हजार १३१ हेक्टर वर म्हणजेच पाच ते साडेपाच लाख टन ऊस उभा आहे.
एकूणच पाचही साखर कारखान्यांचे १९ लाखांचे उस गाळपाचे उद्दीष्ट असल्याने ते गाळपाचा पल्ला कसा गाठणार? हाच उत्सूकतेचा विषय ठरतो आहे. कार्यक्षेत्रासह कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेन ऊसावरच या कारखान्यांची दारोमदार अवलंबून राहणार आहे.
जिल्ह्यातील पाचही साखर कारखान्यांना उसाचा प्रश्न भेडसावणार आहे. कारखान्यांनी गाळपाचे ठेवलेले उद्दिष्टे पार करण्यासाठी त्यांना जिल्हा बाहेरून उस आणल्याशिवाय पर्याय नाही,असे चित्र सध्या जिल्ह्यात आहेत. कारण मागील तीन वर्षांपासून जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहेत. त्यामुळे उसाच्या क्षेत्रात मोठी घट झालेली आहे. जिल्ह्यात फक्त ३९ टक्के उसाची लागवड झालेली आहे. अशा परिस्थित कारखान्यांसमोर गाळपाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कारखान्याचे गाळप उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहे. समृद्धी ४ लाख टन,समर्थ ५ लाख टन, सागर ३ लाख टन, बागेश्वरी ३ लाख टन , रामेश्वर ४ लाख टन या प्रमाणे १९ लाख मे. टनाचे उद्दीष्ठे आहेत. त्यातुलनेत जिल्ह्यात अत्यल्प ऊस असल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.