शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

आरगडे गव्हाणच्या स्वस्तधान्य दुकानाचा अनागोंदी कारभार!

By admin | Updated: December 20, 2015 23:46 IST

जालना : घनसावंगी तालुक्यातील आरगडेगव्हाण येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा अनागोंदी कारभार सुरु असून, मृतांच्या नावेदेखील धान्याची उचल केली जात आहे.

जालना : घनसावंगी तालुक्यातील आरगडेगव्हाण येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा अनागोंदी कारभार सुरु असून, मृतांच्या नावेदेखील धान्याची उचल केली जात आहे. मात्र, तहसील प्रशासन या दुकानदाराला अभय देत असल्याचा आरोप भाऊसाहेब सूर्यभान रंधे यांनी पुराव्यानिशी केला आहे.याबाबत रंधे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. तत्पूर्वी त्यांनी घनसावंगीच्या तहसीलदारांकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. परंतु स्वस्तधान्य दुकानाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात आलेली नाही. परिणामी दुकानदाराचे मनोधैर्य वाढले आहे. ‘तहसील प्रशासन माझ्या म्हणण्यानुसार चालते’ असा दम दुकानदार देत असल्याचा आरोप रंधे यांनी निवेदनात केला आहे. दुकानदाराने हितसंबंध जपण्यासाठी धनदांडग्यांची नावे दारिद्र्यरेषेत टाकून त्यांना बीपीएल, एपीएलच्या शिधापत्रिका उपलब्ध करुन दिल्या आणि गरजवंतांना साधी शिधापत्रिकाही दिली नाही, असे नमूद करुन रंधे यांनी पुढे म्हटले, तलाठी, तहसीलदार यांच्याशी दुकानदार रमेश शिंदे यांचे संगनमत असल्यामुळे कार्डधारकांना रॉकेलपासून वंचित ठेवले जात आहे. गावात आॅगस्ट २०१५ पासून धान्य वितरीत करण्यात आलेले नाही. १५ आॅगस्टपासून शेतकरी लाभार्थ्यांचे धान्य देखील वाटप झालेले नाही. प्रत्येक महिन्यात धान्य व रॉकेल उचलून सुध्दा कार्डधारकांना धान्य वाटप केले नाही. याद्यांमध्ये अनेकांची बोगस नावे टाकण्यात आल्याचा आरोप रंधे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. (प्रतिनिधी)एकाच कुटुंबातील व्यक्ंितना वेगवेगळ्या योजनांमध्ये समाविष्ट करुन त्यांच्या नावे धान्य उचल करणे, मात्र वाटप न करता त्याची काळ्या बाजारात विक्री करणे, असे प्रकार सर्रासपणे केले जात असल्याचे रंधे यांचा आरोप आहे.४अंत्योदय, अन्न सुरक्षा, बीपीएल, पीडीएस या योजनेसाठी एकाच कुटुंबातील व्यक्तींचा समावेश आहे.आरगडेगव्हाण येथील स्वस्ताधान्य दुकानदाराकडून वेगवेगळ्या प्रकारे होत असलेल्या गैरव्यवहाराच्या पुराव्याची जंत्रीच सूर्यभान रंधे यांनी सादर केली आहे. ज्यात लाभार्थ्यांच्या बोगस याद्या, मयत व स्थलांतरीतांची नावे, ५ कि.मी. अंतरापेक्षा दूूर असलेली २० कि.मी.अंतरावरील या दुकानास जोडलेल्या गावांची नावे निवेदनासोबत जोडण्यात आली आहेत.४गैरव्यवहाराचे पुरावे वारंवार देऊनही तहसील प्रशासन कारवाई का करीत नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.