शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

लावून ‘गांधीगिरी’गुलाबाचे झाड

By admin | Updated: September 2, 2014 01:52 IST

बीड : शहरात सुरू झालेल्या पावसाने नगर पालिकेची पोल खोलली असून शहरातून गेलेल्या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे समाजवादी पक्षाच्या वतीने

बीड : शहरात सुरू झालेल्या पावसाने नगर पालिकेची पोल खोलली असून शहरातून गेलेल्या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे समाजवादी पक्षाच्या वतीने सोमवारी खड्डयामध्ये गुलाब व बेशरमीची झाडे झावून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. शहरात गेल्या दहा दिवसांपासून लगातार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शहरातील बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बार्शीनाका पुलाजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. रात्रीच्यावेळी पाऊस पडत असल्यास हे खड्डे दिसून येत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात बोलताना समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुसा पठाण म्हणाले की, शहरातील मुख्य भागामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. वेगात जाणाऱ्या वाहनांना या खड्डयांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. खड्डयांमध्ये पाणी साचले असल्यामुळे खड्ड्यांची खोली किती आहे याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. वाहने वेगात असल्यामुळे खड्डयात गेल्यास अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खड्डे बुजविण्या संदर्भात अनेक वेळा तोंडी मागणी करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे गांधीगिरी करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नसल्याचे मुसाखान यांनी सांगितले. वाहतूक शाखेने दिली होती पत्रेशहरातील बसस्थानक परिसर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, जिल्हा रूग्णालय, बार्शीनाका परिसर, अण्णा भाऊ साठे चौक परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण होत असल्याने हे खड्डे बुजवावेत, असे पत्र वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एम.ए. सय्यद यांनी नगर पालिकेस दिले होते. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता काय करावे, असा प्रश्न वाहतूक पोलिसांसमोर पडला आहे. त्यामुळे पो.नि. रमेश घोडके व स.पो.नि. सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या काही भागातील मोठे खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात येणार आहेत. सिग्नलची समस्या कायमशहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, के.एस.के. कॉलेज चौक, सुभाष रोड परिसर, अण्णा भाऊ साठे पुतळा, बसस्थानक परिसर या भागात असणारे सिग्नल बंद पडले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांना दिवसभर रस्त्यावर उभे राहून वाहनांचे नियोजन लावावे लागत आहे. सिग्नल नसल्यामुळे नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असल्याची बाब समोर आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात नवीन सिग्नल बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई येथील एका कंपनीला टेंडर दिले असल्याचीही माहिती समोर आली आहे. (प्रतिनिधी)