शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कर्जमाफीच हवी

By admin | Updated: December 20, 2015 23:37 IST

परभणी : दोन वर्षांपासून दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी हाच पर्याय असून शासनाने आर्थिक मदतीबरोबरच कर्जमाफीही द्यावी,

परभणी : दोन वर्षांपासून दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी हाच पर्याय असून शासनाने आर्थिक मदतीबरोबरच कर्जमाफीही द्यावी, असा सूर ‘लोकमत’ने रविवारी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला.
जिल्ह्यात पुरेसा पाऊस होत नसल्याने कृषी हंगाम हातचा गेला आहे. त्यामुळे उत्पन्नाचे कुठलेही स्त्रोत उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत शासनाकडे मागील अनेक महिन्यांपासून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागासाठी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. हे पॅकेज दुष्काळ निवारण्यासाठी पुरेसे आहे का? या मूळ प्रश्नाला घेऊन रविवारी ‘लोकमत’ने जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांची मते जाणून घेतली.
जाहीर केलेले पॅकेज पुरेसे आहे का? या प्रश्नावर ७६ टक्के शेतकऱ्यांनी नकारात्मक उत्तर दिले तर १० टक्के शेतकऱ्यांना पॅकेज पुरेसे असल्याचे वाटते. १४ टक्के शेतकऱ्यांनी मात्र या प्रश्नावर तटस्थ भूमिका घेतली. राज्य शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये सर्वाधिक तरतूद कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी केली आहे. राज्यात सोयाबीन, कापूस उत्पादनाबरोबरच इतर पिकेही अनेक शेतकऱ्यांनी घेतली आहेत. बागायतदार शेतकऱ्यांचेही दुष्काळाने नुकसान झाले आहे. त्यामुळे या संदर्भात शासनाचा हा निर्णय योग्य आहे का? असे विचारले असता ७६ टक्के शेतकऱ्यांनी नाही, असे उत्तर दिले. २० टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले. तर ४ टक्के नागरिक सांगता येत नाही, असे उत्तर देऊन मोकळे झाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्जमाफी हवी का? या प्रश्नावर मात्र ७६ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर देत, कर्जमाफीला पाठिंबा दिला तर १४ टक्के नागरिकांना कर्जमाफी नको, असे वाटते. १० टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले. दुष्काळग्रस्तांसाठी शासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत का? या प्रश्नावरही ७६ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर देऊन शासनाची उदासीनता दाखवून दिली. १६ टक्के नागरिकांनी शासनाचे प्रयत्न होत आहेत, असे सांगितले. तर ८ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले.
राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करीत आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात अनेकांनी आपली मतेही मांडली. शासनाने योग्यवेळी योग्य पाऊल उचलून मदत द्यावी. शेतकऱ्यांबरोबरच गोरगरीब शेतकऱ्यांना मदत द्यावी. सरकार असंवेदनशील आहे. हातावर पोट भरणाऱ्यांची काळजी नाही, अशा संतप्त प्रतिक्रियाही मांडल्या. एकंदर शासनाने भरीव मदतीसाठी पावले उचलण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
मदतीसाठी शासनाची टाळाटाळ
दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी शासन टाळाटाळ करीत आहे का? या प्रश्नावर ८२ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले. १६ टक्के नागरिकांना टाळाटाळ होत नसल्याचे वाटते. तर २ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले. एकंदर शासनाच्या धोरणांविषयी नागरिकांमध्ये नाराजी आहे. दुष्काळात जिल्हा होरपळत असून शासनाने मदतीसाठी तातडीने पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.