शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

कंधारात चार टन मासळीची विक्री

By admin | Updated: June 9, 2014 01:11 IST

कंधार : मृग नक्षत्राच्या दिवशी मासे खाण्याची मोठी परंपरा आहे़ राज्यासह परप्रांतातून आणलेली ४ टन मासळीची विक्री झाली़

कंधार : मृग नक्षत्राच्या दिवशी मासे खाण्याची मोठी परंपरा आहे़ राज्यासह परप्रांतातून आणलेली ४ टन मासळीची विक्री झाली़ हातोहात मासळी संपल्याने अनेकांचा हिरमोड झाला़ परंतु मिळणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते़ त्यातून लाखोंची उलाढाल झाल्याची बाब समोर आली आहे़भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा मोठ्या नेटाने पाळल्या जातात़ शेतकऱ्यांचे अन् व्यापाऱ्यांचे चांगले मुहूर्त भिन्न असतात़ शेतकरी गुढी- पाडव्याला नवीन वर्ष मानतो़ आणि सालगडी याच दिवशी करारबद्ध केले जातात़ पेरणीपूर्व मशागतीला जोमात सुरुवात केली जाते़ आपली कामे आटोपून शेतकरी मृग पावसाची प्रतीक्षा करतो़ बी-बियाणे, रासायनिक खताची खरेदी करून आकाशाकडे डोळे लावतो़ पर्जन्यमान चांगले व्हावे, अशी अपेक्षा करत निसर्गाला साकडे घातले जातात़मृग नक्षत्रापासून पावसाने योग्य हजेरी लावली तर पेरणी चांगली होते़ पिकांची योग्य वाढ होते़ शेती पिकांनी बहरली अन् पिकांचा उतारा चांगला येतो़ त्यात पिकाला योग्य भाव लागला की, शेतकऱ्यांची उन्नती होते़ यासाठी पावसाळा उत्तम राहणे बळीराजासह सर्वांच्याच हिताचे असते़ त्यासाठी निसर्गाला शेतकरी मृगनक्षत्रादिवशी पावसासाठी साकडे घालतो़ असा एक मतप्रवाह ग्रामीण भागात आजही रूढ आहे़ मृग नक्षत्राच्या दिवशी मासे सेवन केले की मनाजोगता पाऊस पावसाळ्यात पडतो़ त्यासाठी मोठी झुंबड खरेदीसाठी उडते़ मत्स्य व्यावसायिकांनी ८ जून रोजी नांदेड, बारूळ, पेठवडज, घागरदरा, जगतुंग समुद्र आदी ठिकाणाहून ४ टन मासे विक्रीसाठी आणले होते़ मासे कमी पडू नयेत म्हणून आंध्र प्रदेशातून ७० किलो मासे आणल्याचे समजले़ संकरीत व गावरान मासळीने मासळी बाजार गजबजला होता़ त्यात गावरान मासळी मरळ आणि वाबंटला प्रति किलो ३०० रुपये भाव होता़ बळव २६०, कतला १४०, रहू १४०, मिरगल १४०, कटरना २००, सुपरनस २६० रुपये प्रतिकिलो भाव होता़ तरीही अनेकांना मासे मिळाले नसल्याने हिरमोड झाला़ तरीही ४ टन मासळीवर हजारो जणांनी ताव मारला़ त्यातून लाखोंची उलाढाल झाली़ (वार्ताहर)मृग नक्षत्रादिवशी मासे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते़ त्यासाठी विविध जातीची मासे विक्रीसाठी आणली जातात़ अपुरा मासळी व्यवसाय राहू नये, यासाठी नांदेड, म्हैसा येथून मासे आणले होते. - शंकर गंदलवाड, राम गंदलवाड (मत्स्य व्यावसायिक)मासळीत मेद, चरबी कमी प्रमाणात असल्याने आरोग्याला लाभदायक आहे़ त्यात प्रथिने व व ई जीवनसत्व आहे़ बलवर्धक आहे़ त्यामुळे सेवन करणे आरोग्यास चांगले असते़ - डॉ़राजेश गुट्टे, (आयुर्वेदाचार्य, कंधार)