शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पुलावरील दिवे शॉर्ट

By admin | Updated: May 7, 2014 00:22 IST

औरंगाबाद : महापालिकेने औरंगाबादकरांच्या जिवाला धोका निर्माण करणारे पथदिवे सेव्हन हिल उड्डाण पुलावर बसविले असून ५० टक्के दिवे शॉर्ट झाले आहेत.

औरंगाबाद : महापालिकेने औरंगाबादकरांच्या जिवाला धोका निर्माण करणारे पथदिवे सेव्हन हिल उड्डाण पुलावर बसविले असून ५० टक्के दिवे शॉर्ट झाले आहेत. पावसामुळे एलईडी बल्ब शॉर्ट झाल्याचा दावा विद्युत विभाग करीत आहे. पुलावरील सर्व बल्बचा प्रकाश कमी झाला आहे. बँ्रडेड कंपनीच्या बल्बऐवजी निकृष्ट दर्जाचे बल्ब बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिकेच्या वादात दीड वर्ष पूल अंधारात राहिल्याने पुलावर लहान-मोठे अपघात झाले. अखेर मनपाने पुलावर पथदिवे बसविण्याची जबाबदारी जानेवारी २०१२ मध्ये घेतली. बांधकाम विभागाने बसविलेले ८० पथदिवे पालिकेने काढून टाकले; मात्र नवीन पथदिवे बसविण्यासाठी सव्वा वर्ष लावले. ५० लाख रुपयांच्या खर्चातून पथदिवे बसविण्यास मुहूर्त लागला. जानेवारी २०१३ मध्ये खांब बसविण्याचे काम सुरू झाले. मजबूत असा आधार न देता ते खांब बसविण्यात आले आहेत. तांत्रिक त्रुटी ६० पथदिवे उड्डाण पुलावर बसविले आहेत. प्रत्येक खांबाचे वजन ५० किलो इतके आहे. तीन क्लॅम, चार इंची आकाराचे सहा नट व अर्धा इंची जाडीच्या लोखंडी बॉक्स पॅलेटमध्ये तो खांब बसवून त्यावर दिवा लावण्यात आला आहे. खांबांची अलाईनमेंट केलेली नाही. ते खांब फायबर रिपोर्सपासून बनविले आहेत. बल्ब-खांबांना दोन वर्षे काहीही होणार नाही, असा दावा मनपाचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी केला होता. कामावर ५० लाखांचा खर्च झाला आहे. बजाज या मूळ कंत्राटदाराने लोकल कंत्राटदाराकडून काम करून घेतले आहे. खांब एअरपॅक असून, त्यामध्ये पाणी जाण्यास वाव नाही. त्यामुळे ते गंजून पडण्याची सुतराम शक्यता नाही, असाही दावा त्यांनी केला होता.