शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत वाढला दुपटीने निकाल !

By admin | Updated: June 3, 2014 00:45 IST

भालचंद्र येडवे , लातूर विभागीय मंडळाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे गत पाच वर्षात या विभागाचा निकाल दुपटीने वाढल्याचे चित्र निकालाअंती स्पष्ट झाले़

 भालचंद्र येडवे , लातूर एकेकाळी या ना त्या कारणाने संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या लातूर विभागीय मंडळाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे शिवाय विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी घेतलेल्या परीक्षेच्या गांभीर्यामुळेच गत पाच वर्षात या विभागाचा निकाल दुपटीने वाढल्याचे चित्र सोमवारी निकालाअंती स्पष्ट झाले़ लातूर विभागीय मंडळांतर्गत असलेल्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्याच्या गत पाच वर्षाच्या निकालावर नजर मारली असता मार्च २०१० मध्ये ४७़५९ टक्क्यांवरून मार्च २०१४ मध्ये ९०़६० वर हा निकाल जाऊन पोहोचला आहे़ दरवर्षी लातूर विभागाच्या निकालाचा आलेख वाढतच आहे़ २०१० मध्ये ४७़५९, २०११ - ५६़५७, २०१२ - ७५़४६, २०१३ - ८३़५४ तर २०१४ मध्ये ९०़६० टक्यांवर जावून पोहोचला आहे़ चार ते पाच वर्षांपूर्वी मास कॉपी व शेकडोंवर गैरप्रकार होत असलेल्या या विभागात आता गैरप्रकाराची आकडेवारीही नगण्य होत चालली आहे़ यंदा मार्च २०१४ मध्ये केवळ २२ विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले़ त्यात लातूर ८, नांदेड ४ तर उस्मानाबाद १० अशी संख्या आहे़ याची टक्केवारी पाहिली असता ०़०३ अशी आहे़ या निकालाचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे विभागात एकही शाळा शून्य टक्के निकाल असलेली उपलब्ध नाही, असा दावाही मंडळाने केला. (कौतुक गुणवंतांचे हॅलो ३ वर) सकारात्मक बदल... परीक्षेतील प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मंडळाने यंदा राज्यात पहिल्यांदाच एक उपक्रम हाती घेतला आहे़ लातूर विभागीय मंडळातील अधिकारी- कर्मचार्‍यांची विशेष पथके नेमून प्रत्येक केंद्रावर या पथकांना परीक्षा संपेपर्यंत थांबण्याबाबत सूचना दिल्या होत्या़ शिवाय, अचानकपणे परीक्षा संपल्याबरोबर कोणत्याही एका केंद्रावरील संपूर्ण उत्तर पत्रिका आपल्या ताब्यात घेत हे पथक थेट मंडळ गाठले़ मंडळ अचानकपणे राबवित असलेल्या या उपक्रमामुळे परीक्षेशी संबंधित घटकांच्या विशिष्ट वैचारिक मनोवृत्तीमध्ये सकारात्मक बदल व गैरप्रकार कमी होण्यास मदत झाल्याचा दावाही मंडळ करीत आहे़ वाणिज्य शाखेचा सर्वाधिक निकाल लागला असून, ९२़९० टक्के या शाखेची टक्केवारी आहे़ त्यापाठोपाठ विज्ञान शाखेचा क्रमांक लागतो़ लातूर विभागात विज्ञान शाखेचा ९२़३७, कला ८८़५७, वाणिज्य ८२़९०, एचएससी व्होकेशनल ८८़३९ असा निकाल लागला आहे़ चित्रिकरण केलेल्या परीक्षा केंद्रांची चौकशी बारावी परीक्षेदरम्यान, संपूर्ण राज्यभरात ३१७ परीक्षा केंद्रांचे चित्रिकरण करण्यात आले होते. पैकी लातूर विभागातील १८९ केंद्रांपैकी काही उपद्रवी केंद्रांसह एकूण ५१ केंद्रांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. कोणत्याही क्षणी या केंद्रांची चौकशी होईल, असे मंडळाच्या सूत्रांकडून समजते. लातूर जिल्ह्यात २४३ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ७६ केंद्रांवर परीक्षा झाली. २८ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार ८५५ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यातील २६ हजार ४३९ विद्यार्थी यशस्वी झाले असून, लातूर जिल्ह्याचा ९१.६३ टक्के निकाल लागला आहे. मुलींचा टक्का वाढताच ! बारावीच्या परीक्षेत विभागामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही निकालात मुलींचा टक्का वाढता आहे. विभागात परीक्षेस बसलेल्या मुलां-मुलींपैकी मुलांची टक्केवारी ८८.४५ तर मुलींची ९३.७९ टक्के आहे. याही परीक्षेत ६ टक्क्यांनी मुली पुढे आहेत.