शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
2
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
3
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
4
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
5
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
6
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
7
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
8
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
9
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
10
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
11
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
12
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
13
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
14
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
15
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
16
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
17
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
18
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
19
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले

शेतकऱ्यांना पंधरा कोटींचा फटकाऔस

By admin | Published: October 25, 2014 11:41 PM

तालुक्यात मागील तीन-चार वर्षांपासून सोयाबीनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ चालू वर्षात तर तब्बल ६० हजार २६३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली़ पेरणीसाठी

ा : तालुक्यात मागील तीन-चार वर्षांपासून सोयाबीनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ चालू वर्षात तर तब्बल ६० हजार २६३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली़ पेरणीसाठी झालेला महिनाभराचा विलंब आणि पावसाचे कमी प्रमाण यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पूर्णत: सोयाबीनवर खिळल्या होत्या़ पण सोयाबीनने शेतकऱ्यांना अडचणीतच टाकले आहे़ सोयाबीनचा एकरी उतारा निम्म्यावर आला आहे तर भावातही मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल पंधरा ते सोळा कोटी रूपयांचा फटका बसला असल्याचे पहावयास मिळते़औसा तालुक्यातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे़ यावर्षी खरीप हंगामातील पेरण्यासाठी महिनाभर उशिराने पाऊस झाला़ पावसाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात पेरा केला़ ९८ हजार ८६० हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या़ यामध्ये ६० हजार २६३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरले गेले़ पेरणीसाठी बियाणे, खते, मजुरी असा जवळपास ४ कोटी रूपयांचा खर्च शेतकऱ्यांनी केला़ त्यानंतर खुरपणी, फवारणी, काढणी आणि राशी करणे यावरही जवळपास ७ ते ८ कोटींचा खर्च आहे़ पेरण्या झाल्यानंतर पावसाने दिलेली ओढ आणि सोयाबीन ऐन बहरात असताना गायब झालेला पाऊस यामुळे उताऱ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली़ तसेच चार ते साडेचार हजार रूपये क्विंटलला भाव होता़ पण शेतकऱ्यांकडे माल आल्यास प्रतिक्विंटल अडीच ते तीन हजार रूपयांचा भाव मिळत आहे़एकरी ८ ते १० क्विंटलचा उतार आता ३ ते ६ क्विंटलवर गेला आहे़ त्यातच भाव खालावल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे़ बियाणे, खते, मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत़ पण शेतकऱ्यांच्या मालाचे भाव मात्र घसरणीला लागले आहेत़ तालुक्यातील शेतकऱ्यांना केवळ सोयाबीन पिकाचा १५ कोटींचा फटका बसल्याने तो उद्धवस्त झाला आहे़ उटी बु़ येथील सरपंच व प्रगतशील शेतकरी अ‍ॅड़ भालचंद्र पाटील म्हणाले, यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रावर ६० ते ७० हजार रूपये खर्च केले होते़ उत्पन्न मात्र १ लाखाचे झाले आहे़ आता वर्षभराचा खर्च, सालगड्याच्या पगारी कशा करायच्या हा प्रश्न आहे़ आता रबीसाठी पाऊस नाही झाला तर शेती कसायची कशी, असा प्रश्न पडला आहे़ (वार्ताहर)