शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांकडून निवडणुकीची ‘फिल्डिंग’

By admin | Updated: August 21, 2014 01:20 IST

संतोष धारासूरकर , जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवू इच्छिणारे पुढारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारी पटकविल्याच्या थाटात आपापल्या कार्यक्षेत्रात

संतोष धारासूरकर , जालनाजिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवू इच्छिणारे पुढारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारी पटकविल्याच्या थाटात आपापल्या कार्यक्षेत्रात मोर्चेबांधणी करण्यासह लढतीपूर्वीच प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणण्याच्या खेळ््यांमध्ये दंग झाले आहेत.या महिन्यात आठ दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, आॅक्टोबर महिन्यात दिवाळीपूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या आचारसंहितेचे वेध ओळखून या जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात राजकीय पुढारी कमालीचे सक्रिय झाले आहेत. लोकसभा म्हणजे विधानसभेची तालीम असे समजून अनुभवी पुढाऱ्यांनी त्या निवडणुकीद्वारेच आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. त्या निवडणुकांतील जय - पराजयाचे सुद्धा लगचेच विश्लेषण सुरु करीत अनुभवी पुढाऱ्यांनी महिनाभर आत्मचिंतन सुद्धा केले. तेथूनच हे पुढारी विधानसभेच्या मोर्चे बांधणीसाठी जुंपले. या जिल्ह्यातील सत्तारुढ व विरोधी पक्षाच्या आमदारांनी किंवा गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी चांगलीच कंबर कसली. अन्य इच्छुक सुद्धा धूळ झटकून उभे राहिले. सक्रिय झाले. झपाट्याने कामास सुद्धा लागले. परिणामी गेल्या दोन अडीच महिन्यांत या जिल्ह्यात सत्तारुढ व विरोधी पक्षांच्या पुढाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कार्यक्रमांचा धूमधडका सुरु केला. भूमिपूजने, उद्घाटने वगैरे कार्यक्रमांचा तडाखा आजवर सुरु आहे. तर छोट्या मोठ्या विषयांवरसुद्धा आंदोलनात्मक कार्यक्रमांचाही धडाका सुरु आहे. निवेदने, निदर्शने, धरणे, रास्तारोको, मोर्चे, वगैरे आंदोलनांनी जिल्हा दणाणून गेला आहे. गेल्या महिनाभरापासून विद्यमान आमदार आपणास तिकीट मिळाल्याच्या थाटातच वावरत आहेत. त्यात गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवारही मागे नाहीत. पक्ष श्रेष्टींनी हिरव्या कंदिल दाखविल्याच्या थाटात या सर्वांनी लढतीच व्यूहरचनाही सुरु केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी या आघाडीतील शिवसेना- भारतीय जनता पक्ष या युतीतील मित्र पक्षांबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाजपक्ष, समाजवादी पक्षातील इच्छुक कमालीचे सक्रिय झाले आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वीच्या दुष्काळासह गेल्यावर्षीची गारपीट व या वर्षीची दुष्काळी सदृश स्थिती ओळखून या इच्छुकांनी आपापल्या कार्य क्षेत्रात सर्व सामन्य शेतकऱ्यांशी सुसंवाद साधून दिलासा देण्याचे व त्यांना आकर्षित करण्याचे सर्वार्थाने प्रयत्न सुरु केले आहेत. परिणामी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच जिल्ह्यातील पाचही मतदार संघात प्रमुख पक्षांनी आतापासूनच प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रतिस्पर्धी उमेदवार संपूर्ण मतदारसंघात टोकाचा प्रचार करतील, अशी चिन्हे आहेत. विद्यमान आ. कैलास गोरंट्याल हे पुन्हा भवितव्य आजमिवणार आहेत. पालिकेच्या माध्यमातून दीड-दोन महिन्यांपासून त्यांनी कार्यक्रमांचा धूमधडाका सुरु केला. तर मित्र पक्षातील रशिद पहेलवान यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन बसपात प्रवेश करीत काँग्रेसजनात अस्वस्थता पसरवली. माजीमंत्री अर्जुन खोतकर यांनी घनसांवगीऐवजी पुन्हा जालन्यातून उत्सुकता दर्शवून मोर्चेबांधणी सुरू केली. त्यामुळे स्वकीय भास्कर अंबेकर, विष्णू पाचफुले यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मनसेकडून रवि राऊत, भारिपकडून सुधाकर निकाळजे उत्सुक आहेत.प्रचंड मताधिक्याने लोकसभेवर चौथ्यांदा पोहचलेल्या व पाठोपाठ केंद्रिय मंत्रिमंडळात स्थान पटकविणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्यासाठी भोकरदनची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यांचे सुपूत्र संतोष दानवे, शिवाजीराव थोटे, रमेश गव्हाड हे तिघे भाजपकडून तर विद्यमान आमदार चंद्रकांत दानवे, राजाभाऊ देशमुख राष्ट्रवादीकडून उत्सुक आहेत. काँग्रेसचे एल.के.दळवी, मनसेचे सांडूअण्णा पुंगळे, रावसाहेब भवर, दिलीप वाघ हेही इच्छुक आहेत. परंतु दानवेंविरुद्ध दानवेच अशी लढत होईल, असे सकृतदर्शनी चित्र जाणवत आहे. पालकमंत्री राजेश टोपे यांनी लोकसभेपासूनच घनसावंगीत मोर्चेबांधणी सुुरु केली. संघटन कौशल्याच्या माध्यमातून मोठी फळी उभी केलेल्या टोपे यांनी कार्यक्षेत्रात ठिय्या मांडला आहे. या उलट खोतकर यांनी येथून माघार घेतल्यानंतर शिवसेनेत उमेदवाराचा घोळ सुरू आहे. शिवाजीराव चोथे, लक्ष्मण वडले की अन्य कोणास टोपेंविरोधात रिंगणात उतरवावे असा प्रश्न पडला आहे. माजी आ. विलासराव खरात यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेनेच मध्यंतरी जोर धरला. शिष्टमंडळे मुुंबईत गेली. चर्चा अधुरी आहे. मनसेकडून सुनील आर्दड हे इच्छुक आहेत.गेल्यावेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले आ. सुरेश जेथलिया आता काँग्रेसकडून इच्छुक आहेत. परंतु वाटेवरील जेथलिया यांना अद्यापपर्यंत काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्तच लागला नाही. तरुण नेते राजेश राठोड, अन्वर देशमुख काँग्रेसकडून दावा करीत आहेत. तर ‘राष्ट्रवादी’च्या बाबासाहेब आकात यांनी भक्कम मोर्चेबांधणी सुरु केली. सोशल मिडियात चर्चा रंगविली. त्याद्वारे मित्रपक्षांसमोर प्रश्न उभा केला आहे. भाजपाच्या बबनराव लोणीकर यांच्यासमोर प्रा. राजेश सरकटे यांनी प्रश्न उभा केला आहे. सरकटे यांच्या सक्रियतेने व आक्रमकतेने ते अस्वस्थ आहेत.शिवसेना आ. संतोष सांबरे यांनी दुसऱ्यांदा बदनापूरमधून भवितव्य अजमविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच ते प्रचारात गुंतले आहेत. गेली निवडणूक मनसेकडून लढविलेल्या माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी यांनी राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी सुरु केली तर मनसेकडून सुदामराव सदाशिवे, माऊली गायकवाड हे उत्सुक आहेत. अ‍ॅड. शिवाजीराव आदमाने यांच्यासह अन्य इच्छुकांनीही तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारापूर्वीच प्रचारयुद्ध आतापासूनच रंगले असून त्यामुळे मतदार संभ्रम अवस्थेत आहेत.