शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

एफडीएचे कागदी घोडे

By admin | Updated: July 27, 2014 01:11 IST

शिरीष शिंदे, बीड अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार अन्न पदार्थाच्या उत्पादकांपासून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत प्रत्येकाकडे अन्न परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

शिरीष शिंदे, बीडअन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार अन्न पदार्थाच्या उत्पादकांपासून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत प्रत्येकाकडे अन्न परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शहरातील प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्यूशन यांच्या सभासदांकडून सातत्याने मानदे कायद्याचा भंग होत आहे. त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने कारवाई अपेक्षित आहे. मात्र, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत त्यांना केवळ नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.५ जानेवारी २०११ पासून अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व त्याखालील नियमांची अंमलबजावणी सुरु आहे. अन्न उत्पादन करणाऱ्या विके्रत्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अन्न परवाना नोंदणी अथवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. मात्र, हा परवाना काहींकडे नाही. विशेष म्हणजे अन्न सुरक्षा अधिकारी कारवाई ऐवजी त्यांना नोटिसा पाठवित आहेत. अन्न पदार्थांची विक्री ही अन्न परवानाधारक संस्था यांच्यामार्फत होणे आवश्यक आहे. याबाबतचा अभिलेख प्रत्येक संस्थेने ठेवणे आवश्यक आहे. प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्यूशन असोसिएशनला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे उल्लंघन व त्याच्या नियमांचे सभासदांकडून सातत्याने भंग होत असल्याचे पत्र नुकतेच पाठविले आहे. किराणा दुकानांची तपासणीच नाहीजिल्ह्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे एकच कार्यालय आहे. प्रत्येक तालुक्यात जवळपास दीड हजाराहून अधिक किराणा दुकाने आहेत. ११ तालुक्यात पंधरा ते वीस हजाराहून अधिक किराणा दुकाने असावीत. मात्र, अन्न सुरक्षा अधिकारी हे किराणा दुकानांची तपासणी करत नसल्यामुळे अनाधिकृत दुकानांची संख्या वाढत आहे. या दुकानांतून नोंदणी नसलेले अन्न पदार्थ विक्री केले जात आहेत़ यामुळे जिल्ह्यातील नारिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दोन अधिकारी अन लाखांहूनअधिक व्यावसायिकअन्न व औषध प्रशासन विभागाकडून हॉटेल, धाबे, किराणा दुकान, अन्न पदार्थ विक्रेते, उत्पादन विक्रेते, अन्न पदार्थांशी निगडीत असणाऱ्या व्यावसायिकांची संख्या लाखांहून अधिक आहे़ त्यांच्याकडे अन्न सुरक्षा अथवा नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अन्न सुरक्षा अधिकारी सागर तेरकर व देवानंद वीर यांना कारवाई करावी लागत आहे. कामाची व्याप्ती अधिक असल्याने अन्न व औषध प्रसासन विभागात किमान दहा कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे या कार्यालयाची कामे मंद गतीने सुरु असतात. अधिकार खूप मात्र, कारवाई नगण्यअन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना अधिकार खूप आहेत. मात्र, ते कारवाई करत नसल्याने अनाधिकृत व्यावसायिकांची संख्या वाढतच चालली आहे. कोणत्याही ठिकाणी गुटखा असेल तर त्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने थेट जाणे, दुकान अथवा गोडाऊन बंद असल्यास ते तोडून धाड टाकण्याचे अधिकारी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना आहेत. गुटखा पकडण्याचे अधिकार पोलीसांना आहेत मात्र अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांशिवाय पोलीसांना विशिष्ठ ठिकाणी धाड टाकाणे अशक्य आहे. दुकानांवर बिगर नोंदणीकृत चॉकलेट, गोळ्याबीड शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत किराणा दुकाने आहे. अनधिकृत दुकाने बहुदा शहरालगतच्या भागात असतात. शहरातील काही भागातही अनधिकृत दुकाने आहे. या दुकानांवर अत्यंत निकृष्ट दर्जाच्या चॉकलेट, गोळ्यांची सर्रास विक्री होत आहे. अनधिकृत चॉकलेट, गोळ्यांवर दुकानदारांना आकर्षक मार्जीन मिळत असल्याने त्याची विक्री सुरु आहे. या निकृष्ट दर्जाची चॉलेट, गोळ्या खालल्यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या अन्न उत्पादन करणारे अनेक लहान-मोठे व्यावसायीक आहते. त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.