शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

१६ आॅगस्टपर्यंत मिळाली मुदतवाढ

By admin | Updated: August 1, 2014 00:28 IST

उस्मानाबाद : शासनाने राष्ट्रीय कृषी विमा योजना खरीप हंगाम २०१४ या योजनेत बँकेत विमा प्रस्ताव सादर करण्याची मुदत यापूर्वी ३१ जुलैपर्यंत दिली होती.

उस्मानाबाद : शासनाने राष्ट्रीय कृषी विमा योजना खरीप हंगाम २०१४ या योजनेत बँकेत विमा प्रस्ताव सादर करण्याची मुदत यापूर्वी ३१ जुलैपर्यंत दिली होती. परंतु आता शासनाने पुरक पत्र काढून ही मुदत बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी खालील अटीच्या आधीन राहून १६ आॅगस्टपर्यंत वाढविली आहे. शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. ही मुदतवाढ ३१ जुलै नंतर परंतु वाढीव दिनांकापर्यंत पेरणी झालेल्या क्षेत्रासच लागू राहील. शेतकऱ्यांनी पीक विमा प्रस्तावावर पीक परिस्थिती सर्वसाधारणपणे चांगली असल्याची नोंद करणे आवश्यक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीकविमा प्रस्तावासोबत पेरणीचे क्षेत्र स्पष्टपणे नमूद केलेले विहित सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. बँकांनी सदर प्रमाणपत्र तपासून भविष्यातील उपयोगाकरिता दप्तरी सांभाळून ठेवावे, प्रस्तूत मुदतवाढ सर्वसाधारण विमा संरक्षण मर्यादेपर्यंत म्हणजेच उंबरठा पातळीपर्यंत देय राहील. वाढीव विमा संरक्षण देय राहणार नाही. सोबतच्या प्रपत्रात नमूद पिकाकरिता विहित करण्यात आलेल्या विमा हप्ता दरात अंशत: बदल करण्यात आला असून, सदर सोबतच्या प्रपत्रात नमूद केल्यानुसार असतील तसेच सदर पिकाकरिता यापूर्वी विमा संरक्षण घेतलेल्या प्रकरणातही आता विहित करण्यात आलेले दरच राहील, याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असेही पत्रकात कळविले आहे.१२०० जणांनी भरला विमामाकणी : लोहारात तालुक्यातील माकणी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत ३१ जुलै रोजी पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. परिसरातील तब्बल १ हजार २०० शेतकऱ्यांनी पिके विमा संरक्षित केली आहेत. अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली आहे. अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे रिमझिम स्वरूपाच्या पावसावर पिके कशीबशी तग धरून आहेत. भविष्यात दमदार पाऊस न पडल्यास ही पिके हाती लागतीलच याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरी पीक विमा भरण्यावर अधिक भर देताना दिसून येत आहे. विमा भरण्यासाठी ३१ जुलैैपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुरूवारी येथील जिल्हा बँकेच्या शाखेत पीक विमा भरण्यासाठी एकाच गर्दी केली होती. परिसरातील तब्बल १ हजार २०० शेतकऱ्यांनी येथील शाखेत विमा रक्कम भरली आहे. शाखेअंतर्गत माकणी, करजगाव, चिंचोली, तावशी, उदतपूर आदी गावांचा समावेश आहे.