शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

धान्याची नासाडी थांबणार तरी कधी ?

By admin | Updated: June 30, 2014 00:39 IST

जालना : येथील रेल्वेस्थानकात मालगाड्यांमधून आलेल्या मालाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

जालना : येथील रेल्वेस्थानकात मालगाड्यांमधून आलेल्या मालाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. धान्याची नासाडी थांबणार कधी? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेस पडत आहे. प्रत्येक मालगाडीतून शेकडो क्विंटल धान्य तसेच खताची अक्षरश: माती होते. या प्रकारास आम्ही जबाबदार नसल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. येथील रेल्वेस्थानकाच्या बाजूला मालधक्का आहे. मालगाड्या धान्य, खत, सिमेंट इतर वस्तू घेऊन येतात. विशेषत: या मालधक्क्यावर शेकडो क्विंटल तांदूळ व गव्हाची अतोनात नासाडी होते. जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य या मालगाड्यांमधून येते. देशभरातून आलेले धान्य मालधक्क्यावरील तसेच वखार महामंडळाच्या गोदामात साठविल्या जाते. महिन्यातून तीन ते चार मालगाड्यांतून ५० ते ६० डब्ब्यांची गाडी धान्य घेऊन स्थानकांत पोहचते.मालधक्क्यावर नुकसान रोखण्यासाठी कोणतीच उपाय योजना अथवा रेल्वे प्रशासनाकडून कोणतीच काळजी घेतले जात नसल्याचे विदारक चित्र नेहमीच पाहावयास मिळते. सदर नुकसानीस रेल्वे प्रशासन अथवा ठेकेदार यापैकी कोण जबाबदार आहे याची नेहमीच चर्चा होते. या चर्चेतच प्रत्येक मालगाडीतून आलेल्या धान्याची माती होते. नुकसान रोखण्यासाठी वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांचाही या प्रकाराकडे कानाडोळा आहे. (प्रतिनिधी)रेल्वेची जबाबदारी नाही याविषयी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केली असता, रेल्वेचे काम फक्त ट्रान्सपोर्टेशनचे आहे. नुकसानीशी आमचा काहीही संबंध नाही. वखार महामंडळ व सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी आहे. मालाचे नुकसान होऊ नये म्हणून संबंधितांनी काळजी घ्यावी, पोत्यांच्या चढ उतारसोबतच इतर बाबींची दक्षता घ्यावी.जालना स्थानकावर महिन्यात दहा ते बारा गाड्याजालना जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य, खत, सिमेंट इतर मालासाठी जालना स्थानकांत महिन्याकाठी दहा ते बारा गाड्या येतात. गाड्यातून धान्य अथवा इतर माल काढताना जेमतेम काळजी घेतली जाते. परिणामी, सर्वात जास्त धान्याचे नुकसान होत आहे. वखार महामंडळाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.