शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
3
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
4
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
5
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
6
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
7
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
8
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
9
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
10
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
11
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
12
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
13
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
14
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
15
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
16
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
17
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
18
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
19
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
20
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
Daily Top 2Weekly Top 5

सेलू तालुक्यावर दुष्काळाची छाया

By admin | Updated: July 27, 2014 01:09 IST

सेलू : पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस नसल्यामुळे सेलू तालुक्यात दुष्काळ- सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

सेलू : पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस नसल्यामुळे सेलू तालुक्यात दुष्काळ- सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षी महापूर, अतिवृष्टी व गारपिटीने शेतकऱ्यांना खरीप व रबी हंगामात अपेक्षित उत्पादन घेता आले नाही.
यावर्षी शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली मात्र वेळेवर पाऊस न झाल्याने ही पेरणी वाया गेली. परिणामी अनेक शेतकऱ्यांना महागडी बियाणे खरेदी करून दुबार पेरणी करावी लागली. मागील आठवड्यात काही प्रमाणात पाऊस झाला त्यावर पेरणी झाली मात्र त्यानंतर पाऊस उघडल्याने कोवळी पिके धोक्यात आली आहेत. दोन ते तीन दिवसांपासून कडक उन्हाचे चटके बसत असल्यामुळे कापूस व सोयाबीनची पाने सुकत आहेत. तर पावसाअभावी जमिनीत ओल नाही. त्यामुळे कोवळी पिके किती काळ तग धरणार? हा प्रश्न आहे.२६ जुलैपर्यंत सेलू तालुक्यात केवळ ११३.८० मि.मी. पावसाची नोंद आहे. गतवर्षी याच महिन्यापर्यंत ४६०.२० मि.मी. पाऊस झाला होता. ही तफावत लक्षात घेता यावर्षी अत्यंत भयवह परिस्थिती निर्माण झाल्याचे लक्षात येत आहे. प्रमुख नदी-नाल्या अद्यापही कोरड्या आहेत. पाणीपातळीत अद्याप वाढ झालेली नाही. ठिबकवर पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती. परंतु गुगळी धामणगाव शिवारात एका कंपनीच्या बियाणाचा कापूस लाल व सुकू लागल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागली. दरम्यान, दोन ते तीन दिवसात पाऊस न झाल्यास खरीप हंगामात धोक्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
दुधनाच्या पाणीपातळीत वाढ नाही
निम्नदुधना प्रकल्पातही पावसाअभावी वाढ झालेली नाही. प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा आहे. परंतु काही दिवसांत पाऊस न झाल्यास दुधना काठावरील गावांना पाणीटंचाई भासू शकते. जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर निम्न दुधना प्रकल्पात वेगाने पाणीसाठा होतो. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे प्रकल्पात ६० टक्के पाणीसाठा होता. शहर व अनेक गावांना प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो त्यामुळे १० ते १५ टक्के पाणी काही महिन्यातच प्रकल्पातून कमी झाले आहे.