शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळावर जिल्हा प्रशासनाचे शिक्कामोर्तब

By admin | Updated: December 16, 2015 23:34 IST

परभणी : जिल्हा प्रशासनाने १५ डिसेंबर रोजी जिल्ह्याची अंतीम आणेवारी जाहीर केली असून, ८४८ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी निघाली आहे़

परभणी : जिल्हा प्रशासनाने १५ डिसेंबर रोजी जिल्ह्याची अंतीम आणेवारी जाहीर केली असून, ८४८ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी निघाली आहे़ त्यामुळे एका अर्थी जिल्ह्याच्या दुष्काळावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले आहे़
जिल्ह्यात ३ वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे़ पाऊस वेळेवर आणि पुरेसा होत नाही़ मागील दोन वर्षांत सरासरीच्या ५० टक्के पाऊसही झाला नाही़ पावसाच्या लहरीपणामुळे मागील वर्षी खरीप आणि रबी हे दोन्ही हंगाम हातचे गेले होते़ यावर्षी देखील तीच परिस्थिती आहे़ खरीप हंगाम हातचा गेला असून, रबी हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा आहेत़ परंतु, परतीचा पाऊस झाला नसल्याने हा हंगामही धोक्यात आला आहे़
दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात विविध समस्यांनी डोके वर काढले आहे़ शेतांमध्ये पिके नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत अडकला आहे़ तर दुसरीकडे शेतीवर अवलंबून असणारी कामे ठप्प झाल्याने बेरोजगारीचा प्रश्न समोर आला आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे मजुरांचा ओढा वाढत आहे़ सद्यस्थितीला ग्रामीण भागात सर्व व्यवहार ठप्प पडल्याचे पहावयास मिळत आहे़
जिल्हा प्रशासनातील महसूल विभागाच्या वतीने खरीप आणि रबी पिकांची आणेवारी काढून उत्पादनाचा आढावा घेतला जातो़ यात खरीप पिकांचे ठराविक प्लॉट पाडून उत्पादन मोजले जाते़ त्यावरून १०० च्या तुलनेत पैसेवारी काढली जाते़ सप्टेंबर महिन्यामध्ये जिल्हा प्रशासनाने नजर आणेवारी काढली़ त्यानंतर ३१ आॅक्टोबर रोजी सुधारित आणेवारी जाहीर करण्यात आली़ या दोन्ही वेळेस परभणी जिल्ह्यातील सर्व गावांची आणेवारी ५० पैशाच्या आत निघाली आहे़ त्यामुळे जिल्हा टंचाईग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केला आहे़ १५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने अंतीम आणेवारी घोषित केली़ ही आणेवारी देखील ५० च्या आत आली आहे़ त्यामुळे परभणी जिल्हा हा दुष्काळग्रस्त असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे़ जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली आणेवारीची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठविली आहे़ (प्रतिनिधी)
८४८ गावांत : दुष्काळ परिस्थिती
जिल्ह्यात ८५२ गावे आहेत़ त्यापैकी परभणी तालुक्यातील बसला, सेलू तालुक्यातील करजखेडा, जिंतूर तालुक्यातील चौधरणी, लिंबाळा या चार गावांमध्ये कृषीक्षेत्र नसल्याने ८४८ गावांची आणेवारी काढण्यात आली़ त्यात सर्व गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी निघाली आहे़ परभणी तालुक्यातील १३१, गंगाखेड तालुक्यातमील १०६, पूर्णा ९५, पालम ८२, पाथरी ५८, मानवत ५४, सोनपेठ ६०, सेलू ९४ आणि जिंतूर तालुक्यातील १६८ गावांमध्ये पैसेवारी ५० पेक्षा कमी निघाली आहे़
समस्यांनी वेढला जिल्हा
पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ कृषी क्षेत्राला तर याचा फटका बसलाच आहे़ या शिवाय बेरोजगारी, पाणीटंचाई अशा समस्याही निर्माण झाल्या आहेत़ दिवसेंदिवस या समस्या गंभीर होत चालल्या असून, शासनाला प्राधान्याने आणि गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे़ विशेष म्हणजे दुष्काळाचा फटका परभणीच्या अर्थकारणावरही झाला आहे़ परभणी हा कृषीप्रधान जिल्हा असून, येथील अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे़ परंतु, शेतीला फटका बसल्याने आर्थिक उलाढाल ठप्प पडली आहे़ जिल्ह्याची बाजारपेठ मंदीच्या सावटाखाली असून, दिवसेंदिवस ही समस्याही गंभीर होत आहे़