शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनानेही झटकली जबाबदारी

By admin | Updated: December 28, 2015 23:52 IST

औरंगाबाद : मनपापाठोपाठ जिल्हा प्रशासनानेही सातारा-देवळाई परिसराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी झटकली आहे. मनपानेच या भागाला पाणीपुरवठा सुरू ठेवावा,

औरंगाबाद : मनपापाठोपाठ जिल्हा प्रशासनानेही सातारा-देवळाई परिसराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी झटकली आहे. मनपानेच या भागाला पाणीपुरवठा सुरू ठेवावा, असे पत्र प्रशासनाने मनपाला पाठविले. ग्रामपंचायत, नगर परिषद की महानगरपालिका या हद्दीच्या वादात सातारा- देवळाई परिसरातील नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाने २८ सप्टेंबर २०१४ रोजी सातारा-देवळाई संयुक्त नगरपालिकेची घोषणा केली होती़ नंतरच्या काळात भाजप-सेना युती शासनाने ११ फेब्रुवारी २०१५ रोजी सातारा-देवळाई नगरपालिका मनपात समाविष्ट करण्याची अधिसूचना काढली़ यावर आक्षेप व हरकती दाखल करण्यासाठी १० मार्च २०१५ पर्यंत मुदत दिली़ त्या मुदतीत केवळ दोन आक्षेप दाखल झाले़ राज्य शासनाने विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून या आक्षेपांची सुनावणी घेण्याचे आदेश दिले़ आक्षेपांची सुनावणी घेऊन विभागीय आयुक्तांनी अहवाल शासनाकडे पाठविला़ शासनाचे उपसचिव गो़ आ़ लोखंडे यांनी १४ मे रोजी काढलेल्या अधिसूचनेत सातारा-देवळाई जाहीर करण्यात आलेली नगरपालिका मनपात समाविष्ट करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले़ मात्र, यानंतर अंतिम अधिसूचना निघण्यापूर्वीच तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सातारा-देवळाई हा भाग मनपात हस्तांतरित करण्याची कार्यवाही केली. मनपाने कुठलीही शहानिशा न करता ही प्रक्रिया पूर्ण केली. वॉर्ड फ कार्यालयाकडे तो परिसर जोडला. तसेच आॅगस्टमध्ये पोटनिवडणुका घेण्याचेही जाहीर करून टाकले. जूनपासून मनपाकडून या भागामध्ये १२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आतापर्यंत या टँकरधारकांचे जवळपास एक कोटीहून अधिक बिल थकले आहे़ ८ डिसेंबर रोजी मनपाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले असून यात आगामी १५ दिवसांनंतर सातारा-देवळाई भाग आमच्या हद्दीत येत नसल्याने आम्ही पाणीपुरवठा करू शकत नाही असे नमूद केले आहे़ ४एकीकडे जबाबदारी झटकताना दुसरीकडे या परिसरातील मालमत्ताधारकांकडून करापोटी वसूल करण्यात आलेले ८५ लाख आणि शासनाकडून विविध योजनांचे आलेले असे मिळून जवळपास साडेनऊ कोटी रुपये मनपाने खर्चून टाकले आहेत. पाणी द्यावेच लागेलसातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना पाणी द्यावेच लागेल़ सध्या मनपाकडून सुरू असलेली ही सेवा सुरूच ठेवावी अशी सूचना करण्यात आली आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी मनपाला पत्र देऊन पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे कळविण्यात आले आहे. डॉ़ उमाकांत दांगट, विभागीय आयुक्तचर्चा करून निर्णयहा भाग मनपाकडे नसल्याने टँकरचा खर्च जिल्हा प्रशासनाने द्यावा, असे मनपाचे म्हणणे आहे़ हा खर्च मिळाला नाही, तर टँकर बंद करण्याशिवाय पर्याय नाही़ सखाराम पानझडे, शहर अभियंता