शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीत घट, मोडणीत वाढ

By admin | Updated: July 27, 2015 01:13 IST

राजेश खराडे , बीड निसर्ग कोपल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. कर्ज-पाणी करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीपाचा पेरा केला खरा मात्र, पिकांची मशागत करण्याच्या काळातच

राजेश खराडे , बीडनिसर्ग कोपल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. कर्ज-पाणी करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीपाचा पेरा केला खरा मात्र, पिकांची मशागत करण्याच्या काळातच शेतकऱ्यांना सबंध पिकावरच नांगुर फिरवण्याची वेळ आली आहे. पावसाने ओढ दिल्याने गत आठवड्यात खरीपाच्या पेरणीची शुन्य टक्के नोंद झाली आहे. पाऊस पडला तर दुबार नाहीतर रब्बीची तयारी या उद्देशाने खरीपातील पिके मोडली जात आहेत. यंदा जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाचे जिल्ह्यात आगमन झाले होते. पहिल्या पावसाच्या जोरावरच खरीपाच्या पेऱ्याला सबंध जिल्ह्यात सुरवात करण्यात आली. कमी-जास्त पावसाच्या जोरावर १५ जुन ते १५ जुलै या महिन्याभराच्या कालाधीत ९३ टक्के खरीपाची पेरणी करण्यात आली होती. पावसाने ओढ दिल्याने पेरणीत घट झाली आहे. गत आठवड्यात तर जिल्ह्यात शुन्य टक्के पेरणी झाली असल्याची नोंद कृषि विभागाकडे झाली आहे. सद्य स्थितीला ५ लाख २१ हजार ३४४ हेक्टरवर खरीपाचा पेरा झाला आहे. ३१ जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास २ लाख ३४ हजार ५४३ हेक्टरावरील पिकांची मोडणी होणार आहे तर २ लाख १४ हजार ६३७ हेक्टरवर दुबार पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषि विभागाने वर्तविला आहे. दुबार पेरणीलाही आवश्यक असणारा पाऊस अजून तरी जिल्ह्यात दाखल झालेला नाही. त्यामुळे अडीच लाख हेक्टरच्या खरीपावर धोक्याची घंटा आहे. खरीपातील सर्व पिके कोमजली असून शेतकरी हताश झाला आहे. पावसाच्या आशेवर पिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करून पिकांची जपवणूक करण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून करण्यात आला. मात्र पासवसाने पाठ रविल्याने शेतकरी हताश झाला आहे. पिकांचा सर्वाधिक उत्पादन बाजूलाच आर्थिक फटकाचपेरणीपुर्व मशागतीपासून लागणारा बारदाना ते बि-बीयाणे खरेदीपर्यंत शेतकऱ्यांना एकरी ५ हजार मोजावे लागले होते. लागवडीच्या पिकातून उत्पादन तर सोडच मात्र झालेला खर्च निघाला नाही. शिवाय पिकांची मोडणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत डुबत आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले तरी दीड महिन्यापूर्वी मंजूर झालेला पीकविमा पदरात पडलेला नाही.४बँकांकडून पीककर्जाची प्रकरणेही प्रलंबित ठेवली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे.४काही शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून पेरणी केली होती. मात्र, आता व्याजाचा पैसा व मुद्दल देणार कशी ? हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे.