शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

९८ हजार हेक्टर्सवरील पिके धोक्यात

By admin | Updated: August 24, 2014 00:20 IST

रमेश शिंदे/ महेबूब बक्षी ल्ल औसा दिवसभर उन्हाळ्यासारखं कडक उन्हं तर रात्रभर टिपूर चांदणं़ पावसाळा मध्यावर आला तरी हे चित्र आहे़ औसा तालुक्यातील अर्ध्यापेक्षा अधिक

 रमेश शिंदे/ महेबूब बक्षी ल्ल औसा दिवसभर उन्हाळ्यासारखं कडक उन्हं तर रात्रभर टिपूर चांदणं़ पावसाळा मध्यावर आला तरी हे चित्र आहे़ औसा तालुक्यातील अर्ध्यापेक्षा अधिक पावसाळा संपला तरीही कुठे पाणी नाही़ कमी-अधिक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या पण तब्बल सव्वा महिना झाला पाऊस झाला नाही़ पावसाअभावी ९८ हजार हेक्टरवरील पिके मात्र अखेरच्या घटका मोजताहेत़ पिके तर वाळून जात आहेत़ पण जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचा प्रश्न आता अधिकच गंभीर बनला आहे़ पिकांनी माना टाकल्या़ दावणीची जनावरे आशळभूतपणे मालकाच्या हाताकडे पाहत आहेत़ शेतकरी मात्र कोलमडून पडला आहे़ औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबून व खरीप हंगामाचा तालुका म्हणून ओळखला जातो़ १ लाख २१ हजार ५२७ हेक्टर क्षेत्र आहे़ यामधील १ लाख ११ हजार ५७३ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होते़ यावर्षी कमी अधिक पावसावर शेतकऱ्यांनी ९८ हजार ७०८ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी केली आहे़ तालुक्यातील ६० हजार २३१ हेक्टर क्षेत्रावर सर्वाधिक सोयाबीनची पेरणी झाली आहे़ तर इतर पिकामध्ये २० हजार ७६६ हेक्टरवर तूर, ९ हजार ५२८ ज्वारी, २ हजार २६४ उडीद, २ हजार २१४ मुग, १ हजार २०४ मका, ४३२ भात, २९१ बाजरी, ५१३ भुईमूग, १४७ तीळ, २०७ कारळ व ४७८ हेक्टर क्षेत्रावर इतर पिकाची पेरणी करण्यात आली आहे़ ९ व १० जुलैला पडलेल्या कमी अधिक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या़ त्यानंतर काही ठिकाणी हलका पाऊस पडत गेल्यामुळे पीक परिस्थिती चांगली होती़ पण मागील पंधरा दिवसापासून मात्र पाऊस गायब झाल्यामुळे ९८ हजार हेक्टरवरील पिके आता शेवटच्या घटका मोजत आहेत़ पाऊस उशिरा पडल्याने पेरण्या जरी उशीरा झाल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी उधार, उसनवारी व कर्ज काढून काळ्या आईची ओटी भरली़ पण पावसाअभावी आता शेतकरीच कोलमडून पडला आहे़ दिवसभर कडक उन्ह आणि रात्रभर टिपूर चांदणं़ यामुळे पीक आता अखेरच्या घटका मोजत आहेत़ सध्या तालुक्यातील २५ ते ३० गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ नद्या, नाले, तलाव, विहिरी अजूनही कोरड्या आहेत़ पावसाळ्याची अडीच महिने संपले तरीही दमदार पाऊस झालेला नाही़ दुष्काळाची छाया मात्र दिवसेंदिवस गडद होत चालल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे़ औसा तालुक्यातील भादा परिसरात यंदाच्या पावसाळ्यात एकही मोठा पाऊस झाला नाही़ पेरणीपूर्वी झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली़ त्यात ८० टक्के हे सोयाबीनचे आहे़ पेरणीनंतर एकही पाऊस झाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर नांगर फिरविला आहे़ भादा येथील मधुकर बनसोडे, शिवली येथील इस्माईल तांबोळी, महेबुब तांबोळी, कोरंगळा येथील बाबुराव शिखरे, भादा येथील अझरोद्दीन बक्षी, बाबुलाल होगाडे, अंदोरा येथील शन्नू पटेल, नय्युम पटेल, हारूण शेख, महादेव शेळके, लखनगावचे ज्ञानोबा गोडभरले आदी शेतकऱ्यांनी पिकावर नांगर फिरविला आहे़ ४भादा सर्कलमधील शेकडो शेतकऱ्यांनी खरीप हंगाम गेल्याने आतापासूनच रबीची तयारी सुरू केली आहे़ चांगला पाऊस झाल्यास ज्वारी, गहू, हरभरा पेरण्याची तयारी शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे़ ४ज्या शेतकऱ्यांनी खरीपावर नांगर फिरविला ते शेतकरी कोथिंबीर किंवा अन्य पिकाची लागवड करणार असल्याचे सांगण्यात आले़ दरम्यान, तालुक्यात विविध ठिकाणी दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत़ पाणीटंचाईची समस्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी त्रस्त आहे़