शहरं
Join us  
Trending Stories
1
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
4
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
5
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
6
Top Marathi News LIVE: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक, १२ जणांचा मृत्यू, ३५ जखमी
7
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
8
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
9
ओट्स की पोहे... वेट लॉस आणि एनर्जीसाठी एकदम परफेक्ट आहे 'हा' नाश्ता; फायदे एकदा वाचाच
10
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
11
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
12
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
13
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
14
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
15
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
16
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
17
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
18
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
20
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

दररोज ९० एमएलडी दूषित पाणी जायकवाडीत

By admin | Updated: June 5, 2014 01:10 IST

विकास राऊत, औरंगाबाद जायकवाडीचे पाणी दूषित होण्याचे प्रमाण मागील १० वर्षांच्या तुलनेत दुपटीने वाढले आहे. शहरातील ६६ कि़ मी. नाल्यातून वाहणारे

विकास राऊत, औरंगाबाद जायकवाडीचे पाणी दूषित होण्याचे प्रमाण मागील १० वर्षांच्या तुलनेत दुपटीने वाढले आहे. शहरातील ६६ कि़ मी. नाल्यातून वाहणारे सुमारे ९० एमएलडी पाणी एसटीपीतून शुद्ध न होताच नाथसागराला मिळत असल्यामुळे जलप्रदूषण वाढले आहे. मनपाच्या ४६४ कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेत ६ एसटीपी प्रस्तावित आहेत. योजनेचे काम या महिन्यात सुरू झाल्यास एसटीपी होण्यास ३ वर्षे लागतील. तोपर्यंत शहरातील नाल्यांचे पाणी जायकवाडीला जाऊन मिळणारच आहे. तोवर जायकवाडीतील जलप्रदूषण वाढेल. शहरात सध्या दोन एसटीपी आहेत. त्याचा जायकवाडीशी संबंध नाही. शहरातून दररोज ७० ते ९० एमएलडी पाणी नाल्यातून वाहते. तेच पाणी ब्रह्मगव्हाणमार्गे जायकवाडीत येऊन मिळते. डाव्या कालव्याच्या बाजूने उतार असल्यामुळे पालिकेच्या उपसा केंद्रातून दूषित पाणी फारोळ्याकडे येते. ब्रह्मगव्हाण येथे एमआयडीसीचे उपसा केंद्र होते. त्यांनी ते केंद्र पुढे सरकवले आहे. त्यामुळे शहरातील नाल्याचे पाणी थेट जायकवाडीत येत आहे. एसटीपीतून फिल्टर होऊन ते पाणी जायकवाडीत येणे क्रमप्राप्त आहे. मनपाचे अभियंते म्हणतात १ किलो लिटर प्रती एमएलडी क्लोरिनचे प्रमाण सध्या पाण्यात टाकण्यात येत आहे. मध्यंतरी पाण्यात अळ्या व इतर कीटकांचे प्रमाण वाढलेले दिसून आले होते. जायकवाडीतून येणारे पाणी दूषित असल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. मध्यंतरी शुद्धीकरण केंद्रात कीटक वाढले होते. रसायनांचा वापर वाढविल्यानंतर कीटक नष्ट झाले, असे उपअभियंता के. एम. फालक यांनी सांगितले. जलप्रदूषण वाढल्यामुळे शुद्धीकरणाचा खर्च २० लाखांहून १ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. प्रदूषणामुळे कीटकांचे प्रमाण वाढल्यास खर्च वाढतो. तुरटी, ब्लिचिंग पावडर, क्लोरिन टाकून फारोळा येथे जायकवाडीतून येणारे पाणी शुद्ध करून नक्षत्रवाडी संतुलन टाकीतून शहराकडे येते. शुद्धीकरण खर्च १ कोटी फारोळा येथे जायकवाडीतून येणार्‍या पाण्याचे टीडीएस (टोटल डिझॉल्व्ह सॉलिड) २५० पर्यंत असते. क्लोरिन व इतर रसायनांचा मारा करून ते पाण्याचे टीडीएस २०० ते १७५ पर्यंत आणले जाते. जलगुणवत्ता प्रयोगशाळेच्या अहवालानुसार रसायनांचे प्रमाण ठरते.